शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अनुकंपाधारकांचे लक्ष जिल्हा परिषदेच्या भरतीकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:53 IST

जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या अपेक्षेत असलेल्या उमेदवारांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या अपेक्षेत असलेल्या उमेदवारांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भरती होईल की नाही, या विवंचनेत अनुकंपाधारक आहेत. भरती झाली नाही, तर नवीन वर्षामध्ये सुरुवातीच्या एक- दोन महिन्यातच लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागेल. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील. परिणामी, मागील दहा वर्षांपासून अनुकंपाच्या रांगेत असलेल्या अनेक उमेदवारांवर नोकरीची वयोमर्यादा ओलांडण्याची वेळ येणार असून, प्रशासनाच्या वेळखाऊ धोरणामुळे अशा उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. 

रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीसंबंधी मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांनी खंत व्यक्त केली. दरवर्षी केवळ प्रतीक्षा यादीच अद्ययावत केली जाते. परंतु प्रत्यक्षात भरती प्रक्रिया राबविली जात नाही. डिसेंबर २०१५ मध्ये अनुकंपाधारकांपैकी ज्येष्ठता यादीनुसार अवघ्या ९ जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत भरतीच केलेली नाही. सध्या जि. प. सामान्य प्रशासन विभागाने १९२ अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी तयार केलेली आहे. ज्येष्ठता यादीनुसार भरती केली जाईल, असे सांगण्यात येते. मात्र, एकूण रिक्त पदांच्या १० टक्के जागा अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या जातात.  त्यामुळे अवघ्या १०-१५ उमेदवारांना नोकरी देऊन ती यादी गुंडाळली जाते. 

यासंदर्भात अनुकंपाधारक म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून आम्ही अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत आहोत. डिसेंबरअखेरपर्यंत ही भरती झाली, तर आम्हाला नोकरी मिळू शकते. अन्यथा जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत केव्हाही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यापुढे विधानसभेच्या निवडणुका लागतील. त्यामुळे अनुकंपा भरती होणार नाही. परिणामी, अनुकंपाधारकांपैकी अनेक जण नोकरीसाठी आवश्यक वयोमर्यादा ओलांडतील. परिणामी, कुटुंबावर उपासमारीचे संकट कोसळणार आहे. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या पात्र अनुकंपाधारकांना लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी