शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

शहरात अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांची उपस्थिती १४.६८ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:03 IST

ग्रामीण भागातील उपस्थितीचा टक्का अधिक

ठळक मुद्दे  ६२ शाळा महाविद्यालयातील ५९१ पैकी ८ जण बाधित

औरंगाबाद : ग्रामीण भागातील ९ ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु झाले. तसेच शहरात ११ वी व १२ वीचे वर्ग सुरु करण्याची गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली. त्यामुळे शहरात सोमवारी ९३ पैकी ४३ शाळा, महाविद्यालयात अकरावी व बारावीचे वर्ग भरले. त्यात अकरावीचे ७१२ तर बारावीचे १४०१ विद्यार्थी म्हणजे केवळ १४.६८ टक्केच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. तुलनेत ग्रामीण भागातील उपस्थितीचा टक्का जास्त आहे. सोमवारपर्यंत ६२ शाळा महाविद्यालयातील ५९१ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर तपासणीत ८ जण बाधित आढळले.

शहरात ११६ महाविद्यालये आहेत. त्यात मनपा हद्दीत ९३ शाळा व महाविद्यालयात अकरावी व बारावीचे ३० हजार ७८९ विद्यार्थ्यांची नावनोंदणी आहे. त्यातील ६२ महाविद्यालयाची तपासणीची तर ४३ शाळांच्या उपस्थितीची सोमवारी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली. महापालिका हद्दीतील अकरावी व बारावीचे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुरु करण्याची परवानगी मनपा प्रशासकांनी गत आठवड्यात दिली. हे वर्ग सुरु करण्यासाठी सोमवारपर्यंत ११०७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर तपासणी करायची होती. त्यापैकी ६२ संस्थेतील ५९१ जणांनी तपासणी करुन घेतली. त्यात ७ शिक्षक व १ शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. प्राप्त माहितीनुसार ४३ महाविद्यालयात अकरावीचे ६ हजार ७४५ विद्यार्थी प्रवेशित असून त्यातील ७१२ विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते. १२ वीचे ७ हजार ६४५ विद्यार्थी प्रवेशित असून त्यापैकी १४०१ विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते. शहरात सर्वच महाविद्यालयांत अकरावीच्या विशेष फेरी सुरु आहे.

अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरुअद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गात वाढत आहे. वर्गात जाण्यापूर्वी सॅनिटायझेशन, तापमान तपासनी, मास्क वापरावर महाविद्यालयाकडून लक्ष दिले जात असल्याचे विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर रामदास वनारे यांनी सांगितले.

उपस्थिती वाढतेयमहापालिका क्षेत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करुन अकरावी व बारावीचे वर्ग सुरु होत आहे. विद्यार्थी संख्याही वाढत आहे. ग्रामीण भागातही बऱ्यापैकी विद्यार्थी संख्या वाढली आहे, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय