शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

शहरात अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांची उपस्थिती १४.६८ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:03 IST

ग्रामीण भागातील उपस्थितीचा टक्का अधिक

ठळक मुद्दे  ६२ शाळा महाविद्यालयातील ५९१ पैकी ८ जण बाधित

औरंगाबाद : ग्रामीण भागातील ९ ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु झाले. तसेच शहरात ११ वी व १२ वीचे वर्ग सुरु करण्याची गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली. त्यामुळे शहरात सोमवारी ९३ पैकी ४३ शाळा, महाविद्यालयात अकरावी व बारावीचे वर्ग भरले. त्यात अकरावीचे ७१२ तर बारावीचे १४०१ विद्यार्थी म्हणजे केवळ १४.६८ टक्केच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. तुलनेत ग्रामीण भागातील उपस्थितीचा टक्का जास्त आहे. सोमवारपर्यंत ६२ शाळा महाविद्यालयातील ५९१ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर तपासणीत ८ जण बाधित आढळले.

शहरात ११६ महाविद्यालये आहेत. त्यात मनपा हद्दीत ९३ शाळा व महाविद्यालयात अकरावी व बारावीचे ३० हजार ७८९ विद्यार्थ्यांची नावनोंदणी आहे. त्यातील ६२ महाविद्यालयाची तपासणीची तर ४३ शाळांच्या उपस्थितीची सोमवारी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली. महापालिका हद्दीतील अकरावी व बारावीचे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुरु करण्याची परवानगी मनपा प्रशासकांनी गत आठवड्यात दिली. हे वर्ग सुरु करण्यासाठी सोमवारपर्यंत ११०७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर तपासणी करायची होती. त्यापैकी ६२ संस्थेतील ५९१ जणांनी तपासणी करुन घेतली. त्यात ७ शिक्षक व १ शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. प्राप्त माहितीनुसार ४३ महाविद्यालयात अकरावीचे ६ हजार ७४५ विद्यार्थी प्रवेशित असून त्यातील ७१२ विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते. १२ वीचे ७ हजार ६४५ विद्यार्थी प्रवेशित असून त्यापैकी १४०१ विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते. शहरात सर्वच महाविद्यालयांत अकरावीच्या विशेष फेरी सुरु आहे.

अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरुअद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गात वाढत आहे. वर्गात जाण्यापूर्वी सॅनिटायझेशन, तापमान तपासनी, मास्क वापरावर महाविद्यालयाकडून लक्ष दिले जात असल्याचे विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर रामदास वनारे यांनी सांगितले.

उपस्थिती वाढतेयमहापालिका क्षेत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करुन अकरावी व बारावीचे वर्ग सुरु होत आहे. विद्यार्थी संख्याही वाढत आहे. ग्रामीण भागातही बऱ्यापैकी विद्यार्थी संख्या वाढली आहे, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय