शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांची उपस्थिती १४.६८ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:03 IST

ग्रामीण भागातील उपस्थितीचा टक्का अधिक

ठळक मुद्दे  ६२ शाळा महाविद्यालयातील ५९१ पैकी ८ जण बाधित

औरंगाबाद : ग्रामीण भागातील ९ ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु झाले. तसेच शहरात ११ वी व १२ वीचे वर्ग सुरु करण्याची गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली. त्यामुळे शहरात सोमवारी ९३ पैकी ४३ शाळा, महाविद्यालयात अकरावी व बारावीचे वर्ग भरले. त्यात अकरावीचे ७१२ तर बारावीचे १४०१ विद्यार्थी म्हणजे केवळ १४.६८ टक्केच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. तुलनेत ग्रामीण भागातील उपस्थितीचा टक्का जास्त आहे. सोमवारपर्यंत ६२ शाळा महाविद्यालयातील ५९१ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर तपासणीत ८ जण बाधित आढळले.

शहरात ११६ महाविद्यालये आहेत. त्यात मनपा हद्दीत ९३ शाळा व महाविद्यालयात अकरावी व बारावीचे ३० हजार ७८९ विद्यार्थ्यांची नावनोंदणी आहे. त्यातील ६२ महाविद्यालयाची तपासणीची तर ४३ शाळांच्या उपस्थितीची सोमवारी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली. महापालिका हद्दीतील अकरावी व बारावीचे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुरु करण्याची परवानगी मनपा प्रशासकांनी गत आठवड्यात दिली. हे वर्ग सुरु करण्यासाठी सोमवारपर्यंत ११०७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर तपासणी करायची होती. त्यापैकी ६२ संस्थेतील ५९१ जणांनी तपासणी करुन घेतली. त्यात ७ शिक्षक व १ शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. प्राप्त माहितीनुसार ४३ महाविद्यालयात अकरावीचे ६ हजार ७४५ विद्यार्थी प्रवेशित असून त्यातील ७१२ विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते. १२ वीचे ७ हजार ६४५ विद्यार्थी प्रवेशित असून त्यापैकी १४०१ विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते. शहरात सर्वच महाविद्यालयांत अकरावीच्या विशेष फेरी सुरु आहे.

अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरुअद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गात वाढत आहे. वर्गात जाण्यापूर्वी सॅनिटायझेशन, तापमान तपासनी, मास्क वापरावर महाविद्यालयाकडून लक्ष दिले जात असल्याचे विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर रामदास वनारे यांनी सांगितले.

उपस्थिती वाढतेयमहापालिका क्षेत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करुन अकरावी व बारावीचे वर्ग सुरु होत आहे. विद्यार्थी संख्याही वाढत आहे. ग्रामीण भागातही बऱ्यापैकी विद्यार्थी संख्या वाढली आहे, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय