शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

औरंगाबाद मनपातील अडीच कोटींच्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:57 IST

या घोटाळ्यातून मुक्तता करून घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांनी आयुक्तांची कोणतीही मंजुरी न घेता परस्पर विभागीय आयुक्तांना पत्र लिहून निधी वापरण्याची मुभा द्यावी म्हणून शुक्रवारी बैठक आयोजित केली होती.

औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या २४ कोटींच्या निधीतून परस्पर अडीच कोटींचे काम करणारे मनपा अधिकारी चांगलेच संकटात सापडले आहेत. या घोटाळ्यातून मुक्तता करून घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांनी आयुक्तांची कोणतीही मंजुरी न घेता परस्पर विभागीय आयुक्तांना पत्र लिहून निधी वापरण्याची मुभा द्यावी म्हणून शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. अधिकाऱ्यांच्या या कारभारावर जोरदार आगपाखड करण्यात येत आहे.

तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी २४ कोटींचा निधी दिला होता. या निधीतून पाच रस्त्यांची कामे करण्यात आली. २४ कोटींतील ६ कोटी रुपये शिल्लक होते. यातील दोन कोटी रुपयांचा निधी माजी महापौर बापू घडमोडे यांनी पळविला. त्यानंतर माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी अडीच कोटी रुपये घेतले. मोंढानाका ते बालाजीनगर या रस्त्याचे कामही करण्यात आले. कंत्राटदार डी. व्ही. मोहिते यांना काम देण्यात आले होते. अर्धे काम झाल्यावर कंत्राटदाराने १ कोटीहून अधिक रक्कमही उचलली. ही रक्कम २४ कोटींच्या खात्यातून देण्यात आली. काम अंतिम टप्प्यात पोहोचले असताना उर्वरित निधीसाठी फाईल दाखल केली.

यावेळी अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. हा निधी वापरण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरीच नाही. या समितीमध्ये जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त सदस्य आहेत. निधीतील रक्कम वापरायची असल्यास विभागीय आयुक्तांसह समिती सदस्यांची परवानगी आवश्यक आहे. मनपा आयुक्त या समितीचे सचिव आहेत. कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी परस्पर विभागीय आयुक्तांना पत्र लिहून समितीची बैठक घ्यावी, अशी मागणी केली. विभागीय आयुक्तांनीही शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. बैठकीत नेमके काय झाले याचा तपशील मनपा अधिकारी, विभागीय आयुक्त देण्यास तयार नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. आयुक्तांना अंधारात ठेवून मनपा अधिकारी आपल्या स्तरावर विभागीय आयुक्तांना पत्र कसे काय देऊ शकतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादCorruptionभ्रष्टाचार