शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

कंत्राट न दिल्याने हल्ला

By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर शनिवारी अज्ञात गुंडांनी केलेला हल्ला हा पाणीपट्टी वसुलीचे कंत्राट न मिळाल्यामुळे करण्यात आल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद : सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर शनिवारी अज्ञात गुंडांनी केलेला हल्ला हा पाणीपट्टी वसुलीचे कंत्राट न मिळाल्यामुळे करण्यात आल्याची चर्चा आहे. पाणीपुरवठा होत नसल्याच्या कारणावरून तो हल्ला झाला नसण्यामागे एकमेव कारण म्हणजे, हल्ला करणारे व्यवसायप्रमुख गौरीशंकर बासू यांचे नाव घेऊन शिवीगाळ करीत होते. आमच्याशी वैर महागात पडेल, अशी धमकी देत त्यांनी कंपनीचे कार्यालय फोडले. कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. हल्लेखोर कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत.पाण्यासाठी नागरिक जलकुंभावर आंदोलने करीत आहेत. हल्लेखोर पाण्यासाठी हल्ला करण्यासाठी आले असते तर त्यांनी जलकुंभ गाठला असता. परंतु त्यांनी बासू यांचे नाव घेत कार्यालयात प्रवेश करून तोडफोड केली. कंपनीने याप्रकरणी कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही. पाणीपट्टी वसुलीचे कंपनीने खाजगीकरण केले आहे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधणे आणि ते नियमित करण्याचे काम दोन एजन्सींना देण्यात आले आहे. हे काम घेण्यासाठी काही राजकीय वरदहस्त प्राप्त मंडळी इच्छुक आहे. परंतु ते काम शिवसेना-भाजपाच्या गोटातील मर्जीतील लोकांना देण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या आस्थापनेवर शिवसेना नेत्यांच्या जवळचे कर्मचारी कामाला आहेत. त्यामुळे काही वाद जरी झाले तरी ते विकोपाला जाणार नाहीत, असे कंपनीला वाटते. भाजपाचे काही पदाधिकारी कंपनीने नेमलेल्या कर्मचारी व सक्तीच्या पाणीपट्टी बिलांच्या पावत्यांबाबत आक्रमक आहेत. परंतु आता वसुली यंत्रणेत युतीच्या जवळची मंडळी असल्यामुळे समांतरवरून राजकीय बोंब केली जात आहे.