शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

पाच आरोपींविरुद्धचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा उच्च न्यायालयात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 16:53 IST

गुन्हा, तसेच आरोपीविरुद्ध दाखल केलेले दोषारोप पत्र रद्द करावे, यासाठी आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता.

ठळक मुद्देफिर्यादी व आरोपींचे आपसातील वाद दिवाणी स्वरूपाचे असल्याचे मत नोंदवत खंडपीठाने गुन्हा रद्द केला.

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस स्टेशनअंतर्गत दाखल ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ५ आरोपींवर दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.व्ही.के. जाधव आणि न्या.श्रीकांत कुलकर्णी यांनी रद्द केला.

लक्ष्मण गवळी यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्याचे वडील बन्सी गवळी यांनी २० सप्टेंबर, २०१० रोजी खासगी सावकार सय्यद रहीम सय्यद महेबूब याच्याकडून घरखर्च व शेती विकासासाठी ३ लाख रुपये घेतले होते. या व्यवहाराच्या विश्वासापोटी बन्सी गवळी यांनी त्यांच्या नावावरील ३ एकर जमिनीचे खरेदीखत सय्यद रहीम याच्या नावे केले होते. बन्सी गवळी याने सय्यद रहीम यास एकूण रुपये ४ लाख ५० हजार रुपये परत केले होते, परंतु तरीही खरेदीदार सय्यद रहीम हा शेतीची नोंदणी (रजिस्ट्री) बन्सींच्या नावे करीत नव्हता. सय्यद रहीम व त्याच्या इतर ४ साथीदारांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी एक महिन्यापासून अन्न व पाण्याचा त्याग केला होता. ते १६ फेब्रुवारी, २०२० रोजी मरण पावले होते.

या फिर्यादीवरून ५ आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्हा, तसेच आरोपीविरुद्ध दाखल केलेले दोषारोप पत्र रद्द करावे, यासाठी आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता. प्रथमदर्शनी आरोपींविरुद्ध कोणताही गुन्हा दिसून येत नाही. आरोपींना विक्री केलेली जमीन परत मिळविण्यासाठी फिर्यादीने सदर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपींचे आपसातील वाद दिवाणी स्वरूपाचे असल्याचे मत नोंदवत खंडपीठाने गुन्हा रद्द केला. आरोपीतर्फे ॲड.सुदर्शन जी. साळुंके यांनी बाजू मांडली, तर सरकारतर्फे ॲड.वट्टमवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाBeedबीडAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी