शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खुल्या प्रवर्गातील ‘शिक्षकोत्सुक’ बेरोजगारांमध्ये संतापाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:03 IST

जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करण्याचे खुल्या प्रवर्गातील युवकांचे स्वप्न भंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ३४ पैकी ३३ जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा दाखविण्यात आली नाही. खुल्या प्रवर्गातील बेरोजगारांसाठी शिक्षक भरतीच्या जागा वाढविण्यात याव्यात, यासाठी डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनतर्फे ७ मार्चपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी दिली.

ठळक मुद्दे७ मार्चपासून पुन्हा बेमुदत उपोषण : ३४ पैकी ३३ जिल्ह्यांत खुल्या प्रवर्गाला शून्य जागा

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करण्याचे खुल्या प्रवर्गातील युवकांचे स्वप्न भंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ३४ पैकी ३३ जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा दाखविण्यात आली नाही. खुल्या प्रवर्गातील बेरोजगारांसाठी शिक्षक भरतीच्या जागा वाढविण्यात याव्यात, यासाठी डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनतर्फे ७ मार्चपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी दिली.जि.प.त शेवटची शिक्षक भरती २०१० मध्ये झाली. यानंतर नुकतीच पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्यात जि.प. महापालिका, नगरपालिका आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये दहा हजार शिक्षकांची पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली. जि.प.मध्ये शिक्षक भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली असता, खुल्या प्रवर्गातील जागा शून्यावर पोहोचल्यामुळे काही संघटनांनी बिंदू नामावलीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. या आरोपांची निवेदने शिक्षणमंत्र्यांकडे पाठविण्यात आली. यानुसार शिक्षण विभागाने ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षित प्रवर्गासाठी पदे उपलब्ध होत आहेत अशा जिल्हा परिषदांमध्ये भरतीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व पदांवर भरती करण्यात यावी, उर्वरित जिल्हा परिषदांमध्ये सद्य:स्थितीत केवळ अनुशेषाच्या आरक्षित प्रवर्गातील भरतीसाठी उपलब्ध पदांपैकी ५० टक्के पदांवर भरती करण्यात यावी. ज्या जिल्हा परिषदांमध्ये केवळ आरक्षित प्रवर्गातील ५० टक्के पदांवर भरती करण्यात येईल, त्या जि.प.मध्ये बिंदू नामावली पुन्हा तपासून अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात येईल, असे स्पष्ट केले. या निर्णयानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेमधून शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढण्यात येत आहे. यात राज्यातील ३४ जिल्हा परिषदांपैकी केवळ एकाच जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी १३२ जागा भरण्यात येणार आहेत. उर्वरित ३३ जि.प. मध्ये एकही शिक्षकाचे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार नाही. जागा वाढविण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बरोजगारांच्या संघटनेतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे संतोष मगर यांनी स्पष्ट केले.‘एसईबीसी’ प्रवर्गात राज्यात ३६२ जागानव्याने आरक्षण जाहीर झालेल्या मराठा समाजाच्या ‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग’ला (एसईबीसी) १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार जि.प.च्या जाहिरातींमध्ये या आरक्षणाचा समावेश आहे. मात्र, राज्यातील ३४ जि.प. पैकी २४ मध्ये एसईबीसी प्रवर्गाला शून्य जागा दाखविण्यात आल्या आहेत. उर्वरित १० जि.प.मध्ये ३६२ जागा उपलब्ध असल्याची माहिती संतोष मगर यांनी दिली. यातही बिंदू नामावलींमुळे गोंधळ उडाला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :jobनोकरीMaratha Reservationमराठा आरक्षण