शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्यांची करावी तशी केली खातीरदारी; औरंगाबादेतून १८ हजार स्थलांतरित रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 16:28 IST

औरंगाबाद स्थानकावरून ७ मेपासून २३ मेपर्यंत १० रेल्वे सोडण्यात आल्या.

ठळक मुद्देप्रशासनाची पहाटे ५ वाजताच सुरू व्हायची ड्यूटी२०० हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम

औरंगाबाद : मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील १८ हजार स्थलांतरित मजूर, नागरिकांना १० रेल्वेद्वारे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना करण्यात आले. त्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाला प्रचंड तारेवरची कसरत करावी लागली. रेल्वे जाणार त्यादिवशी पहाटे ५ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत महसूल, पोलीस आणि रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण दिवस हजारोंच्या गर्दीत जीव धोक्यात घालून काम केले. ही गर्दी हाताळताना प्रशासनाने आरोग्याची पूर्ण काळजी घेतल्याने सुदैवाने एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली नाही.

औरंगाबाद स्थानकावरून ७ मेपासून २३ मेपर्यंत १० रेल्वे सोडण्यात आल्या. यामध्ये मध्यप्रदेशसाठी २, उत्तर प्रदेशासाठी ४, झारखंडसाठी २ आणि बिहारसाठी २, अशा १० रेल्वेंचा समावेश होता. ७ तारखेपासून २३ मेपर्यंतचा पूर्ण काळ नियोजनात गेल्यामुळे २४ मे रोजी रविवारी महसूल, पोलीस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.

ऐनवेळी वाढायची मजुरांची संख्यामराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यातील स्थलांतरित नागरिकांना रेल्वेस्थानकावरून पाठविण्यात आले. संबंधित जिल्हा प्रशासन २०० नागरिकांचे नियोजन आदल्या दिवशी करीत असे; परंतु पाठविताना ३०० ते ४०० नागरिकांना पाठवीत असे. त्यामुळे रेल्वेत सोशल डिस्टन्सिंग पाळून मजुरांना पाठविण्याची अडचण येत असे. परिणामी, अनेकांना एक-दोन दिवस अयोध्यानगरीच्या मैदानावरच सांभाळावे लागले. यामध्ये पोलीस यंत्रणेला प्रचंड ताण सहन करावा लागला, तर महसूल प्रशासनाला रात्रभर थांबलेल्या मजुरांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी धावपळ करावी लागली, असे अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले.

२०० हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम२३ मे रोजी दहावी रेल्वे बिहारमधील मुज्जफरनगरला रवाना झाली. ७ मेपासून शनिवार २३ मेपर्यंत २०० हून अधिक महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी स्थलांतरितांना पाठविण्यासाठी व्यस्त होते. उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, पोलीस उपायुक्त नीकेश खाटमोडे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हजारो नागरिकांना सुखरूप पाठविण्यासाठी परिश्रम घेतले. 

१८ तास काढले रेल्वेस्थानकावरअप्पर तहसीलदार देशमुख म्हणाले, एकेका दिवशी १८ तास रेल्वेस्थानकावरच काढावे लागले. समन्वयक अधिकारी डॉ. बाणापुरे, उपायुक्त खाटमोडे आदींसह पूर्ण टीम रेल्वेस्थानकावर कार्यरत होती. किरकोळ अपवाद वगळता रेल्वेस्थानकावर कोणतीही वादग्रस्त घटना झाली नाही. शिस्तीने आणि नियोजनाने प्रत्येकाला दिवसभर पुरेल एवढे अन्न, पाणी सोबत देऊन पाठविले. शनिवारी शेवटची रेल्वे रवाना झाल्यानंतर मोठ्या जबाबदारीतून बाहेर पडल्याचे सध्या जाणवत असल्याचे देशमुख म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे