शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पाहुण्यांची करावी तशी केली खातीरदारी; औरंगाबादेतून १८ हजार स्थलांतरित रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 16:28 IST

औरंगाबाद स्थानकावरून ७ मेपासून २३ मेपर्यंत १० रेल्वे सोडण्यात आल्या.

ठळक मुद्देप्रशासनाची पहाटे ५ वाजताच सुरू व्हायची ड्यूटी२०० हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम

औरंगाबाद : मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील १८ हजार स्थलांतरित मजूर, नागरिकांना १० रेल्वेद्वारे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना करण्यात आले. त्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाला प्रचंड तारेवरची कसरत करावी लागली. रेल्वे जाणार त्यादिवशी पहाटे ५ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत महसूल, पोलीस आणि रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण दिवस हजारोंच्या गर्दीत जीव धोक्यात घालून काम केले. ही गर्दी हाताळताना प्रशासनाने आरोग्याची पूर्ण काळजी घेतल्याने सुदैवाने एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली नाही.

औरंगाबाद स्थानकावरून ७ मेपासून २३ मेपर्यंत १० रेल्वे सोडण्यात आल्या. यामध्ये मध्यप्रदेशसाठी २, उत्तर प्रदेशासाठी ४, झारखंडसाठी २ आणि बिहारसाठी २, अशा १० रेल्वेंचा समावेश होता. ७ तारखेपासून २३ मेपर्यंतचा पूर्ण काळ नियोजनात गेल्यामुळे २४ मे रोजी रविवारी महसूल, पोलीस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.

ऐनवेळी वाढायची मजुरांची संख्यामराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यातील स्थलांतरित नागरिकांना रेल्वेस्थानकावरून पाठविण्यात आले. संबंधित जिल्हा प्रशासन २०० नागरिकांचे नियोजन आदल्या दिवशी करीत असे; परंतु पाठविताना ३०० ते ४०० नागरिकांना पाठवीत असे. त्यामुळे रेल्वेत सोशल डिस्टन्सिंग पाळून मजुरांना पाठविण्याची अडचण येत असे. परिणामी, अनेकांना एक-दोन दिवस अयोध्यानगरीच्या मैदानावरच सांभाळावे लागले. यामध्ये पोलीस यंत्रणेला प्रचंड ताण सहन करावा लागला, तर महसूल प्रशासनाला रात्रभर थांबलेल्या मजुरांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी धावपळ करावी लागली, असे अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले.

२०० हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम२३ मे रोजी दहावी रेल्वे बिहारमधील मुज्जफरनगरला रवाना झाली. ७ मेपासून शनिवार २३ मेपर्यंत २०० हून अधिक महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी स्थलांतरितांना पाठविण्यासाठी व्यस्त होते. उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, पोलीस उपायुक्त नीकेश खाटमोडे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हजारो नागरिकांना सुखरूप पाठविण्यासाठी परिश्रम घेतले. 

१८ तास काढले रेल्वेस्थानकावरअप्पर तहसीलदार देशमुख म्हणाले, एकेका दिवशी १८ तास रेल्वेस्थानकावरच काढावे लागले. समन्वयक अधिकारी डॉ. बाणापुरे, उपायुक्त खाटमोडे आदींसह पूर्ण टीम रेल्वेस्थानकावर कार्यरत होती. किरकोळ अपवाद वगळता रेल्वेस्थानकावर कोणतीही वादग्रस्त घटना झाली नाही. शिस्तीने आणि नियोजनाने प्रत्येकाला दिवसभर पुरेल एवढे अन्न, पाणी सोबत देऊन पाठविले. शनिवारी शेवटची रेल्वे रवाना झाल्यानंतर मोठ्या जबाबदारीतून बाहेर पडल्याचे सध्या जाणवत असल्याचे देशमुख म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे