शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेपूर्वी ‘समांतर जलवाहिनी’चा नारळ फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:00 IST

राज्य शासनाकडून हिरवा कंदिल

ठळक मुद्दे१५०० कोटींचा प्रकल्पशंभर टक्के शासन अनुदान२०५० पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून योजना

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच समांतर जलवाहिनीच्या नवीन योजनेचा नारळ फोडण्यात येणार आहे. शुक्रवारी महाराष्ट्र शासनाने तब्बल १५०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला हिरवा कंदिल दाखविला. या योजनेसाठी लागणारा संपूर्ण खर्च राज्य शासन देणार आहे. २०५० पर्यंत औरंगाबाद शहराची लोकसंख्या किती असेल हे डोळ्यासमोर ठेवून योजना पूर्ण करण्यात येणार आहे. ३० वर्षांसाठी योजनेचे डिझाईन राहणार आहे. 

मागील दोन दिवसांपासून मनपाचे अधिकारी व कर्मचारी मुंबईत तळ ठोकून आहेत. गुरुवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण केले. १५०० कोटी रुपयांच्या योजनेचे हे डीपीआर होते. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकावी असे प्रस्तावात नमूद केले होते. मनीषा म्हैसकर यांनी या प्रस्तावात काही सुधारणा सुचविल्या होत्या. मनपा अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत बसून प्रकल्प सल्लागार समितीच्या सहकार्याने दुरुस्तीसह प्रस्ताव शुक्रवारी पुन्हा प्रधान सचिवांसमोर सादर केला. २०५० मध्ये औरंगाबाद शहराची लोकसंख्या किती असेल याचा विचार करून प्रकल्प राबविण्यात यावा. २५०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकून शहरात पाणी आणावे. नक्षत्रवाडी येथे शासनाच्या जागेवर मोठ जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करावा. ४०० एमएलडीपर्यंत शहरात पाणी येईल, यादृष्टीने सर्व नियोजन करावे. योजनेसाठी १५०० कोटी रुपये खर्च आला तरी चालेल. योजनेचे डिझाईन किमान ३० वर्षांसाठी असावे, असेही मनीषा म्हैसकर यांनी नमूद केले. मनपाकडे समांतर जलवाहिनीचे ३०० कोटी रुपये पडून आहेत. नवीन योजनेसाठी लागणारे १२०० कोटी रुपये राज्य शासन देईल. नवीन योजनेत महापालिकेने सातारा-देवळाईचा समावेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या सादरीकरणप्रसंगी राज्यमंत्री अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे, पीएमसीचे समीर जोशी यांची उपस्थिती होती.

२३०० कि. मी. अंतर्गत जलवाहिन्या१५०० कोटी रुपयांच्या या योजनेत नो नेटवर्क एरिया, सातारा-देवळाईसह २३०० कि.मी.च्या अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. शहरात एकूण नवीन ५० पाण्याच्या टाक्या उभारण्यात येतील.

महत्त्वाचे निर्णय असे१. जायकवाडी ते नक्षत्रवाडी २५०० मि. मी. व्यासाची नवीन जलवाहिनी टाकावी. ४० किलोमीटर जलवाहिनीची लांबी राहील.२. नवीन जलवाहिनीचा प्रस्ताव येत्या चार दिवसांमध्ये मनपाने महाराष्ट्र वन प्राधिकरणाला द्यावा. प्राधिकरणाने पुढील दहा दिवसांत प्रकल्पाला टेक्निकल मंजुरी द्यावी.३. १५ जुलैपूर्वी सर्व प्रक्रियेसाठी मनपाने राज्य शासनाकडे नवीन जलवाहिनीचा प्रस्ताव दाखल करावा.४. महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळताच मनपाने जुलैअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी करावी.५. चांगले दर्जेदार आणि कमी वेळेत काम करून देणाऱ्या कंपनीचीच या कामासाठी महापालिकेने निवड करावी.६. दर आठ दिवसाला स्वत: मनीषा म्हैसकर आपल्या कक्षात योजनेचा आढावा घेणार आहेत. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकारfundsनिधी