शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

सोयीच्या प्रभागासाठी इच्छुकांची कसरत; महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 20:05 IST

Aurangabad Municipal Corporation Election: प्रभाग पद्धतीत आपला वॉर्ड आसपासच्या कोणत्या दोन वॉर्डांशी जोडला जाईल, यावर इच्छुक उमेदवार तर्कवितर्क लावत आहेत.

ठळक मुद्देराज्य शासनाने जुनी वॉर्ड पद्धत रद्द करून प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून चातकाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या राजकीय मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर रोजी राज्यातील काही महापालिकांना नवीन प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. औरंगाबाद महापालिकेने ( Aurangabad Municipal Corporation Election ) अद्याप कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यास सुरुवात केली नाही. मात्र, राजकीय मंडळींनी आतापासूनच सोयीचे प्रभाग येऊ शकतील का, यादृष्टीने जोरदार चाचपणी सुरू केली असून, प्रशासनानेही सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली. दिग्गज उमेदवारांनी आपल्या सोयीचा प्रभाग कसा होईल, यासंदर्भात जोरबैठका सुरू केल्या आहेत.

एप्रिल २०१९ मध्ये महापालिकेची मुदत संपली. कोरोना संसर्ग आणि वॉर्ड आरक्षणाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. कोरोनाचा संसर्ग बराच कमी झाला आहे. त्यातच राज्य शासनाने जुनी वॉर्ड पद्धत रद्द करून प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून चातकाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या राजकीय मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रभाग पद्धतीत आपला वॉर्ड आसपासच्या कोणत्या दोन वॉर्डांशी जोडला जाईल, यावर इच्छुक उमेदवार तर्कवितर्क लावत आहेत. माजी नगरसेवकांनी तर आपल्या स्वप्नातील प्रभागही तयार करून टाकले आहेत. आपल्या सोयीनुसार शेजारचे दोन वॉर्ड जोडून कामालाही सुरुवात केली. प्रभागात आपल्याच पक्षाचे दोन सहकारी उमेदवार कोण असू शकतात, यावरही इच्छुकांनी शिक्कामोर्तब करून टाकले. त्यामुळे पक्षनेत्यांना उमेदवार निवडण्याचा ताणही कमी झाला. काही राजकीय मंडळी संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध नागरी प्रश्न घेऊन महापालिका मुख्यालयावर आंदोलनेही करीत आहेत. इच्छुक उमेदवार मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागले असले तरी मनपा प्रशासन अजून ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे.

कच्चा आराखडा तयार होणार; पण...महापालिका प्रशासन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कच्चा प्रभाग आराखडा तयार करणार आहे. मात्र, हे काम कधी होईल हे जाहीर केलेले नाही. कारण, शहरातील दिग्गज उमेदवार, इच्छुक उमेदवार आम्हांला सोयीनुसार प्रभाग तयार करून द्या, अशी गळ घालतील. तेव्हा प्रशासनाला कात्रीत सापडल्यासारखे होईल, त्यामुळे हे काम अत्यंत गोपनीय पद्धतीनेच करण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला आहे.२०१५ मधील पक्षीय बलाबलशिवसेना- २९भाजपा- २३एमआयएम- २४काँग्रेस- ११बहुजन समाज पार्टी- ०५नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- ०४रिपाइं (डेमोक्रॅटीक)- ०२अपक्ष- १७एकूण - ११५

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक