शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

विभागीय आयुक्तांना ठाणे मनपा आयुक्तपदासाठी विचारणा; महापालिका आयुक्तांनाही हवी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:10 IST

नवीन अधिकारी आल्यास परिस्थिती समजून घेण्यात जाईल आणखी वेळ

ठळक मुद्दे महामारीच्या काळात बदल्यांची चर्चापाण्डेयना धीर धरण्याचा सल्ला

- विकास राऊत 

औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना ठाणे महापालिका आयुक्तपदासाठी विचारणा करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. याचवेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनीही स्वत:हून आपली बदली करावी, अशी विनंती प्रशासनाकडे केल्याची माहिती आहे. 

औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही यासंर्भात एक सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यांच्या बदलीची चर्चा घडवून आणली होती. मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर अधिकाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा मागे पडला. मनपा आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांंना आता शहराचा आवाका आलेला आहे. मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवर त्यांची आधीपासूनच पकड आहे. शिवाय कोरोनाच्या परिस्थितीत नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली तर शहर व प्रशासनाचे आकलन होण्यास त्या अधिकाऱ्यास कालावधी लागेल. त्यामुळे सरकारलाही येथे नवा आयुक्त नेमण्याची घाई करता येणार नाही. उलट पाण्डेय हेच परिस्थितीशी मुकाबला करु शकतात, असा उच्चपातळीवर सूर आहे. 

दुसरीकडे केंद्रेकरांना ठाण्याचे आयुक्त म्हणून विचारणा झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ठाणे महापालिकेत नवीन अधिकाºयाचा शोध सुरू आहे. ठाण्यात नवीन अधिकारी कोण आणावा असा विचार होत असताना शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून केंद्रेकर यांना ठाणे मनपा आयुक्तपदी विचारणा झाली; परंतु त्यांनी ठाणे येथे बदलीला संमती दिली नसल्याची माहिती आहे.  सध्या ते येथेच थांबणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. विभागीय आयुक्त म्हणून केंद्रेकर यांचा कार्यकाळ सव्वा वर्षे पूर्ण झाला आहे. यापूर्वी २०१८ जानेवारीमध्येच त्यांची बदली औरंगाबाद विभागीय आयुक्तपदावर बदली झाली होती; परंतु माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पूर्ण ताकदीने केंदे्रकर यांची बदली रोखली होती.

मूळचे परभणी जिल्ह्यातील असल्यामुळे मराठवाड्याची जाण असलेले अधिकारी म्हणून केंद्रेकर यांच्याकडे पाहिले जाते. राज्य कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त या पदांसह औरंगाबाद मनपा आयुक्त, बीड जिल्हाधिकारी या पदांची धुरा त्यांनी सांभाळली.कोरोनाच्या महामारीत नांदेड येथील संवदेशनील प्रकरण त्यांनी हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिल्हाधिकारी उदय चौधरी ग्रामीण भागात गुंतले आहेत, मनपा आयुक्त क्वारंटाईन आहेत. अशा परिस्थितीत औरंगाबादसह मराठवाड्याची जबाबदारी केंद्रेकर यांच्यावर आहे. 

अपयशाचा ठपका घेऊ नका...औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना बदलीची इच्छा व्यक्त करणे म्हणजे अपयशाचा ठपका घेण्याऐवजी येथील परिस्थिती नियंत्रणात आणूनच बदलीचा विचार करा, असा सल्ला पाण्डेय यांना मिळाल्यामुळे त्यांनी बदलीचा मुद्दा बाजूला ठेवल्याचे समजते. पाच दिवसांच्या क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर ते नव्या जोमाने लागतील, असे दिसते. 

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या