शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विभागीय आयुक्तांना ठाणे मनपा आयुक्तपदासाठी विचारणा; महापालिका आयुक्तांनाही हवी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:10 IST

नवीन अधिकारी आल्यास परिस्थिती समजून घेण्यात जाईल आणखी वेळ

ठळक मुद्दे महामारीच्या काळात बदल्यांची चर्चापाण्डेयना धीर धरण्याचा सल्ला

- विकास राऊत 

औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना ठाणे महापालिका आयुक्तपदासाठी विचारणा करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. याचवेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनीही स्वत:हून आपली बदली करावी, अशी विनंती प्रशासनाकडे केल्याची माहिती आहे. 

औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही यासंर्भात एक सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यांच्या बदलीची चर्चा घडवून आणली होती. मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर अधिकाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा मागे पडला. मनपा आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांंना आता शहराचा आवाका आलेला आहे. मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवर त्यांची आधीपासूनच पकड आहे. शिवाय कोरोनाच्या परिस्थितीत नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली तर शहर व प्रशासनाचे आकलन होण्यास त्या अधिकाऱ्यास कालावधी लागेल. त्यामुळे सरकारलाही येथे नवा आयुक्त नेमण्याची घाई करता येणार नाही. उलट पाण्डेय हेच परिस्थितीशी मुकाबला करु शकतात, असा उच्चपातळीवर सूर आहे. 

दुसरीकडे केंद्रेकरांना ठाण्याचे आयुक्त म्हणून विचारणा झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ठाणे महापालिकेत नवीन अधिकाºयाचा शोध सुरू आहे. ठाण्यात नवीन अधिकारी कोण आणावा असा विचार होत असताना शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून केंद्रेकर यांना ठाणे मनपा आयुक्तपदी विचारणा झाली; परंतु त्यांनी ठाणे येथे बदलीला संमती दिली नसल्याची माहिती आहे.  सध्या ते येथेच थांबणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. विभागीय आयुक्त म्हणून केंद्रेकर यांचा कार्यकाळ सव्वा वर्षे पूर्ण झाला आहे. यापूर्वी २०१८ जानेवारीमध्येच त्यांची बदली औरंगाबाद विभागीय आयुक्तपदावर बदली झाली होती; परंतु माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पूर्ण ताकदीने केंदे्रकर यांची बदली रोखली होती.

मूळचे परभणी जिल्ह्यातील असल्यामुळे मराठवाड्याची जाण असलेले अधिकारी म्हणून केंद्रेकर यांच्याकडे पाहिले जाते. राज्य कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त या पदांसह औरंगाबाद मनपा आयुक्त, बीड जिल्हाधिकारी या पदांची धुरा त्यांनी सांभाळली.कोरोनाच्या महामारीत नांदेड येथील संवदेशनील प्रकरण त्यांनी हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिल्हाधिकारी उदय चौधरी ग्रामीण भागात गुंतले आहेत, मनपा आयुक्त क्वारंटाईन आहेत. अशा परिस्थितीत औरंगाबादसह मराठवाड्याची जबाबदारी केंद्रेकर यांच्यावर आहे. 

अपयशाचा ठपका घेऊ नका...औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना बदलीची इच्छा व्यक्त करणे म्हणजे अपयशाचा ठपका घेण्याऐवजी येथील परिस्थिती नियंत्रणात आणूनच बदलीचा विचार करा, असा सल्ला पाण्डेय यांना मिळाल्यामुळे त्यांनी बदलीचा मुद्दा बाजूला ठेवल्याचे समजते. पाच दिवसांच्या क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर ते नव्या जोमाने लागतील, असे दिसते. 

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या