शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

वंचित आघाडीला दिलेला ‘तलाक’नामा अधिकृत, असदुद्दीन ओवेसी यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 03:08 IST

भविष्यात पुन्हा युती करण्याच्या मुद्द्यावर मात्र मौन

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देण्याचा निर्णय मागील आठवड्यात एमआयएम पक्षाने घेतला. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाची भूमिका मांडली. ही भूमिका एकट्या जलील यांची नसून पक्षाची आहे, असे मत आज हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मांडले. भविष्यात पुन्हा वंचितसोबत युती होईल का? या थेट प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

शुक्रवारी खा. इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीला एमआयएम ‘तलाक’ देत असल्याचे पत्रक काढले. एमआयएमला विधानसभा निवडणुकीत फक्त ८ जागा देण्यात येत आहेत. औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीतून पक्षाचा एक आमदार निवडून आलेला असताना, हा मतदारसंघ एमआयएम पक्षाला देण्यात आला नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय आम्ही घेत असल्याचे पत्रात नमूद केले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही जलील यांच्या तलाकनाम्याला महत्त्व न देण्याचे ठरविले. जोपर्यंत खा. असदुद्दीन ओवेसी अधिकृतपणे घोषणा करणार नाहीत, तोपर्यंत युती कायम असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मंगळवारी एमआयएमच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती औरंगाबादेत घेण्याचे काम सुरू केले. पहिल्याच दिवशी नांदेड जिल्हा, नाशिक जिल्हा आणि पुण्यातील वडगाव शेरी विधानसभेसाठी मुलाखती घेण्यात आल्या.महाराष्ट्रातील निर्णय महाराष्ट्र युनिट घेणारहैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओवेसी यांनी नमूद केले की, इम्तियाज जलील यांनी घेतलेला निर्णय ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणी लढवायच्या, याचा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र युनिट घेणार आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर