शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वंचित आघाडीला दिलेला ‘तलाक’नामा अधिकृत, असदुद्दीन ओवेसी यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 03:08 IST

भविष्यात पुन्हा युती करण्याच्या मुद्द्यावर मात्र मौन

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देण्याचा निर्णय मागील आठवड्यात एमआयएम पक्षाने घेतला. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाची भूमिका मांडली. ही भूमिका एकट्या जलील यांची नसून पक्षाची आहे, असे मत आज हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मांडले. भविष्यात पुन्हा वंचितसोबत युती होईल का? या थेट प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

शुक्रवारी खा. इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीला एमआयएम ‘तलाक’ देत असल्याचे पत्रक काढले. एमआयएमला विधानसभा निवडणुकीत फक्त ८ जागा देण्यात येत आहेत. औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीतून पक्षाचा एक आमदार निवडून आलेला असताना, हा मतदारसंघ एमआयएम पक्षाला देण्यात आला नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय आम्ही घेत असल्याचे पत्रात नमूद केले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही जलील यांच्या तलाकनाम्याला महत्त्व न देण्याचे ठरविले. जोपर्यंत खा. असदुद्दीन ओवेसी अधिकृतपणे घोषणा करणार नाहीत, तोपर्यंत युती कायम असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मंगळवारी एमआयएमच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती औरंगाबादेत घेण्याचे काम सुरू केले. पहिल्याच दिवशी नांदेड जिल्हा, नाशिक जिल्हा आणि पुण्यातील वडगाव शेरी विधानसभेसाठी मुलाखती घेण्यात आल्या.महाराष्ट्रातील निर्णय महाराष्ट्र युनिट घेणारहैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओवेसी यांनी नमूद केले की, इम्तियाज जलील यांनी घेतलेला निर्णय ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणी लढवायच्या, याचा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र युनिट घेणार आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर