शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वंचित आघाडीला दिलेला ‘तलाक’नामा अधिकृत, असदुद्दीन ओवेसी यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 03:08 IST

भविष्यात पुन्हा युती करण्याच्या मुद्द्यावर मात्र मौन

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देण्याचा निर्णय मागील आठवड्यात एमआयएम पक्षाने घेतला. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाची भूमिका मांडली. ही भूमिका एकट्या जलील यांची नसून पक्षाची आहे, असे मत आज हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मांडले. भविष्यात पुन्हा वंचितसोबत युती होईल का? या थेट प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

शुक्रवारी खा. इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीला एमआयएम ‘तलाक’ देत असल्याचे पत्रक काढले. एमआयएमला विधानसभा निवडणुकीत फक्त ८ जागा देण्यात येत आहेत. औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीतून पक्षाचा एक आमदार निवडून आलेला असताना, हा मतदारसंघ एमआयएम पक्षाला देण्यात आला नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय आम्ही घेत असल्याचे पत्रात नमूद केले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही जलील यांच्या तलाकनाम्याला महत्त्व न देण्याचे ठरविले. जोपर्यंत खा. असदुद्दीन ओवेसी अधिकृतपणे घोषणा करणार नाहीत, तोपर्यंत युती कायम असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मंगळवारी एमआयएमच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती औरंगाबादेत घेण्याचे काम सुरू केले. पहिल्याच दिवशी नांदेड जिल्हा, नाशिक जिल्हा आणि पुण्यातील वडगाव शेरी विधानसभेसाठी मुलाखती घेण्यात आल्या.महाराष्ट्रातील निर्णय महाराष्ट्र युनिट घेणारहैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओवेसी यांनी नमूद केले की, इम्तियाज जलील यांनी घेतलेला निर्णय ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणी लढवायच्या, याचा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र युनिट घेणार आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर