शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 11:36 IST

मागील काही वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तलाठ्यांचे बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी त्यात मर्जीनुसार अनेकांना प्रतिनियुक्त्या देत. यात अनेकदा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तलाठ्यांच्या बदल्या आता उपविभागीय अधिकारी (एसडीएम) ऐवजी जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रस्थापित तलाठ्यांना धडकी भरली आहे. बदल्या करताना किमान जवळचे ठिकाण मिळावे, यासाठी तलाठी संघटनेने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांची भेट घेऊन मागणी केली. जिल्ह्यात कन्नड, वैजापूर, पैठण, सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर असे पाच उपविभाग असून त्यांच्या अंतर्गत ४९० तलाठी सजा आहेत. एका सजाअंतर्गत २० ते २५ गावांचा कारभार आहे.

मागील काही वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तलाठ्यांचे बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी त्यात मर्जीनुसार अनेकांना प्रतिनियुक्त्या देत. यात अनेकदा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या. यातूनच माजी विभागीय आयुक्तांनी चौकशी समिती देखील नेमली असून समिती चौकशी करीत आहे. वानगी दाखल सांगायचे म्हटले, तर शेकटा येथील तलाठ्याला प्रतिनियुक्ती देत अब्दीमंडीमधील शत्रूसंपत्तीचा फेर घेण्यासाठी नियुक्त केले होते. संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचे निलंबनही शासनाने केले होते. या प्रकारांना आळा बसण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर बदल्यांचे अधिकार शासनाने दिले असून १५ ऑगस्टपूर्वी सर्व बदल्या होण्याच्या सूचना १२ ऑगस्टच्या आदेशानव्ये केल्या आहेत. आता बदल्यांमध्ये पारदर्शकता राहते की संघटना शिष्टमंडळाच्या भेटीनुसार प्रशासन निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

समुपदेशन केले कुणाचे...समुपदेशनाने बदल्या करण्याचे शासनाचे आदेश आहेत; परंतु ४९० सजांवर कार्यरत तलाठ्यांचे समुपदेशन कुणी व कधी केले हा प्रश्न आहे. ऑनलाईन बदल्या करण्यात तांत्रिक अडचणी आहे. त्याला विलंब लागणार आहे. त्यामुळे बदली करताना लगतच्या उपविभागामध्ये तलाठ्यांची बदली करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.

विनंती बदल्यांचे अधिकार आयुक्तांना...महसूल मंत्र्यांना असलेले विनंती बदल्यांचे अधिकार आता विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यात अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लघु टंकलेखक, महसूल सहायक, वाहनचालक, तलाठी या गट क- कर्मचाऱ्यांच्या कलम ४ (४) दोन व कलम ४ (५) नुसार बदल्यांचे महसूल मंत्र्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील महसूल क्षेत्र असे...महसुली गावे : १३६२उपविभाग : ५मंडळ : ८४तलाठी सजा : ४९०ग्रामपंचायती : ८६७ग्रामीण लोकसंख्या : २० लाखएकूण लोकसंख्या : ३७ लाख १ हजार २८२

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागTransferबदली