शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कचरा डेपो हटताच नारेगावची भरारी; लघु उद्योजक, व्यावसायिकांमुळे परिसरात सुबत्ता

By साहेबराव हिवराळे | Updated: June 13, 2023 20:27 IST

आर्थिक वजन वाढल्याने नारेगावच्या कक्षा रुंदावल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : एकेकाळी नारेगावला जायचे म्हटले की, नको रे बाबा, अशी सामान्यांची प्रतिक्रिया असे. कचरा डेपोमुळे असह्य दुर्गंधीने रोगराई पसरली होती. पण डेपो बंद झाला अन् टोलेजंग इमारती उभा राहिल्या. लघु उद्योजक तसेच व्यावसायिकतेमुळे नारेगावाच्या आर्थिक प्रतिष्ठेत भर पडली असून, बेरोजगारांच्या हाताला काम मिळाल्याने होलसेलपासून ते किरकोळ वस्तूंसाठी शहरात जाण्याची आता गरज राहिलेली नाही.

बांधकाम साहित्य, फळाची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तसेच फर्निचरचे तर हबच तयार झाले आहे. इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळा असून, विद्यार्थी संख्याही चांगली आहे. येथील नागरिकांच्या शेतजमिनी त्यावेळी चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात गेल्या. त्यांनी इतरत्र जमिनी घेतल्या तर काहींनी उद्योग व्यवसाय सुरू केले. कारखान्यात कामगार म्हणून अनेकजण निवृत्त झाले. विविध जोडधंद्यांतही अनेक युवकांनी जम बसविला आहे. आर्थिक सेवा देणाऱ्या बँकांची सेवा केंद्रे किमान दहा ठिकाणी आहेत. अशा गोष्टींनी रोजगाराला हातभारच लागत आहे.

लघु उद्योजक व व्यावसायिकांमुळे नारेगावात सुबत्तामनपाच्या कचरा डेपोला हटविण्यासाठी नारेगाव व परिसरातील पळशी, गोपाळपूर, महाल पिंप्री, वरूड, वरझडी, वडखा इ. भागांतील शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरूच ठेवले अन् त्यास यश मिळाले. त्याच दरम्यान, शहरातील विकासकामांत अडथळे ठरणाऱ्या वसाहतीतील घरे हटविण्यात आली अन् त्यांनी अगदी कमी किमतीत जागा खरेदी करून येथे निवास आणि व्यवसाय उभारले. त्यामुळे नारेगाव ही एक स्वतंत्र बाजारपेठ बनली आहे.

पाण्याच्या टाकीचे काम जोरातयेथील नागरिकांना सातत्याने बोअरवेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. मोजक्या भागांत महानगरपालिकेचे पाणी मिळते. पण, बहुतांश नागरिकांना जारच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते.

पाणी समस्या दूर होणार १६८० कोटी रुपयांतून नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू आहे. शाळेतील गुणवत्ता पाहता उच्च पदावर जाण्याचे स्वप्न येथील मुलांनी बाळगले आहे.- माजी नगरसेवक गोकुळ मलके

नारेगावचे पाऊल पडते पुढे...औद्योगिक क्षेत्राच्या कुशीत नारेगाव असल्याने मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांना सेवा सुविधा देण्यासाठी मनपा, तसेच लोकप्रतिनिधींनी विकासकामांसाठी मदत केलेली आहे. रस्ते, समाज मंदिर, उद्यान, आरोग्य केंद्र असून, भविष्याच्या दृष्टीने युवकांचे पाऊल पुढे पडत आहे.- माजी नगरसेवक भगवान रगडे

रोजगार मेळावे आयोजित करावेत...शासनाच्या माध्यमातून आपल्या आवड-निवडीचे क्षेत्र लक्षात घेऊन येथे रोजगार मेळावे घेऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात त्याचा फायदा होईल.- अंकुश दानवे

नारेगावच्या कक्षा रुंदावल्या...नारेगाव पूर्वी शेतीवर अवलंबून होते. परंतु, आता सिमेंटच्या उंच इमारती उभा राहिलेल्या आहेत. आर्थिक वजन वाढल्याने नारेगावच्या कक्षा रुंदावल्या आहेत.- कौतिकराव तवले

चेहरामोहरा बदललाघरासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्यासह फर्निचर, लोखंड, सिमेंट आणि प्रशिक्षित बांधकाम व्यावसायिकांनी नारेगावचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. हॉटेल व मंगल कार्यालयापासून येथे सर्व काही मिळत आहे. शहरातील व्यावसायिकही नारेगावात येत आहेत.- कादर शहा

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय