शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा परिणाम, दहावी- बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून; तरीही निकाल वेळेतच होईल जाहीर

By विजय सरवदे | Updated: March 18, 2023 17:27 IST

विद्यार्थी हितासाठी काही शिक्षक पेपर तपासत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा सध्या सुरु आहेत. परंतु, जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या संपामुळे शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कस्टोडियनकडून आलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळा- महाविद्यालयात पडून आहेत.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. तेव्हापासून सुमारे दहा दिवस कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने बारावीच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर या संघटनेच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्कार मागे घेतला. त्यानंतर १४ मार्चपासून जुनी पेन्शन योजना संदर्भात राज्यव्यापी संप सुरू झाला. या संपात कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना सहभागी झाली. विद्यार्थी हितासाठी परीक्षेचे काम करणार ; परंतु उत्तरपत्रिका तपासणार नसल्याची भूमिका या संघटनेने घेतली. त्यामुळे मागील चार दिवसांपासून पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीचे काम खोळंबले आहे. तशीच गत दहावी परीक्षेची देखील झाली आहे. माध्यमिक शिक्षकांचाही संपात सहभाग असल्यामुळे काही शिक्षक पेपर तपासतात, तर काही शिक्षकांनी पेपर तपासणीचे काम थांबविले आहे.

कशी असते पेपर तपासणीची प्रक्रियादहावी- बारावीच्या परीक्षेत पेपर संपल्यानंतर केंद्र संचालक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे कस्टोडियनकडे जमा करतात. बोर्डाने दहा- ते पंधरा परीक्षा केंद्रासाठी एक कस्टोडियन नेमलेला असतो. कस्टोडियनकडून यादीतील शाळा- महाविद्यालयांच्या पत्त्यावर तपासणीसाठी उत्तरपत्रिका टपालाने पाठविल्या जातात. मुख्याध्यापक किंवा प्राचार्य संबंधित विषयाच्या शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी देतात. तपासल्यानंतर सदरील उत्तरपत्रिका बोर्ड मार्फत जमा केल्या जातात.

बोर्ड काय म्हणतेयासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर थोडाफार परिणाम झाला आहे. तरीही विद्यार्थी हितासाठी काही शिक्षक पेपर तपासत आहेत. तरीही शाळा- महाविद्यालयांत किती गठ्ठे पडून आहेत, याची माहिती २५ मार्चपासून समजेल. त्या दिवसापासून दहावी आणि बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा करण्यास सुरूवात केली जाणार आहे. काहीही झाले तरी निकाल वेळेतच जाहीर होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा