शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

कृत्रिम पावसाचा मराठवाड्यात प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 04:06 IST

पाण्याची, पिकांची तरी चिंता मिटावी; पहिल्याच दिवशी कमी ढग व फ्रिक्वेन्सीचा अडसर

औरंगाबाद : पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असताना जायकवाडी धरणाचा अपवाद सोडला, तर मराठवाड्यातील धरणं अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजता चिकलठाणा विमानतळावरून ख्याती वेदर मॉडिफिकेशनच्या विमानाने उड्डाण घेतले खरे. मात्र, विरळ ढग आणि फ्रिक्वेन्सी न जुळल्याने कृत्रिम पाऊस न पाडताच अवघ्या ४५ मिनिटांत विमान खाली उतरले.दुष्काळग्रस्त भागात ५२ दिवस कृत्रिम पावसाचे प्रयोग होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात ४0 टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान झाले आहे, तर बीड, लातूर आणि उस्मानाबाद हे जिल्हे अजूनही कोरडेच आहेत. ऐन पावसाळ्यात जवळपास ७९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सर्व १४४ प्रकल्पांपैकी १०३ कोरडेठाक आहेत. जालना जिल्ह्यात सरासरीच्या २५० मिलिमीटर (३५ टक्के) एवढा कमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४२.६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, नाशिक नगरमधून पाणी सोडल्याने जायकवाडी धरणात ७३ टक्के जलसाठा झाला आहे.कृत्रिम पावसाचा पहिला दिवसविमानाला दोन्ही बाजूंनी ४८ सोडिअम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’ बसविले. दुपारी एक वाजता शास्त्रज्ञांसह विमानाने औरंगाबाद पश्चिमेला उड्डाण भरले. ढगांची गर्दी नसल्याने आणि फ्रिक्वेन्सी न जुळल्याने दोन वाजेच्या सुमारास विमान खाली उतरले.असा पडतो कृत्रिम पाऊस ‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडार व पावसासाठी वापरण्यात येणारे सोडिअम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’, ढगांची गर्दी तपासून त्या दिशने ‘एरोसोल्स’(नळकांड्या) सोडण्यात येतात. ‘सी बॅण्ड डॉप्लर’ या रडारच्या साहाय्याने ढगांचे स्कॅनिंग केले जाते. त्या स्कॅनिंग इमेजमध्ये (फोटो) किती पाणी आहे, पडण्याची क्षमता कशी आहे, किती किलोमीटरच्या रेंजमध्ये ते पाणी पडेल, याचा अंदाज लावण्यात येतो. त्यानुसार विमानाच्या साहाय्याने नळकांड्या ढगात सोडण्यात येतात आणि ते ढग दाटून येऊन त्या भागात पावसाच्या सरी होऊन बरसतात. जगभरामध्ये तीन ते चार देशांमध्ये या महागड्या तंत्राने पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो.मंत्र्यांना दिसले विदर्भात ढगमराठवाड्यात ‘ट्रायल रन’च्या अनुषंगाने विमानाचे शुक्रवारी उड्डाण होत नाही, तोवरच मंत्रालयातून एका मंत्र्याने विमानतळावर एका शास्त्रज्ञाला फोनवरून विदर्भात ढग असून, तिकडे उड्डाण करण्याच्या सूचना केल्या! सी-डॉप्लर रडार अजून कार्यान्वित झालेले नाही, अक्षांश, रेखांश सेटिंग होत नाही, तोवरच विदर्भाकडे प्रयोग करण्याच्या सूचना आल्याने शास्त्रज्ञही गांगरून गेले.