शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

कृत्रिम पाऊस पश्चिम महाराष्ट्रात; विमानाचा थांबा मराठवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:31 IST

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारल्यानंतर आता पुन्हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शासनाकडून झाला आहे

ठळक मुद्देसोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग आगामी चार महिन्यांसाठी केला जाणारवापरण्यात येणारे विमान मात्र औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेईल.

- विकास राऊत 

औरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारल्यानंतर आता पुन्हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शासनाकडून झाला आहे. सोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग आगामी चार महिन्यांसाठी केला जाणार असून, त्यासाठी वापरण्यात येणारे विमान मात्र औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेईल. ज्या दिवशी प्रयोग नसेल, त्या दिवशी विमान येथेच थांबेल.

केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग ३ जुलैपासून सुरू झाला आहे. २५० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात आली असून, त्यातून दोन विमानांची खरेदी देखील करण्यात येणार आहे. ती विमाने कोणत्या विमानतळावर थांबतील, याबाबत अद्याप काहीही सूचना नाहीत. 

सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्य छायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले आहे. जून २०१५ मध्ये मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पावसाचा प्रयोग) करण्यात आला होता. त्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होते. २७ कोटींचा खर्च त्यासाठी झाला होता. ख्याती वेदर मॉडिफि केशन या कंपनीला तीन वर्षांपूर्वी कंत्राट दिले होते. आता तीच कंपनी सोलापूर परिसरात प्रयोग करणार आहे. 

पुण्यातील भौतिकशास्त्र तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, मुळात सोलापूरला केंद्र स्थापन करणे हे भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नाही. ३ जुलैपासून सोलापूर येथून कृ त्रिम पावसाचा प्रयोग सुरू झाला आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र एका राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे असल्याचे ते म्हणाले.

या प्रश्नाची उत्तरे मिळेनात प्रयोगासाठी वापरण्यात येणारी स्फोटके कुठे ठेवणार, सोलापूर परिसरात प्रयोग केल्यानंतर विमान औरंगाबादेत थांबल्यानंतर उड्डाण घेताना मराठवाड्यातही सिलव्हर कोटेड सिलिंडर हवेत सोडणार की फक्त उड्डाण घेणार. विमान यावर्षी खरेदी करण्यात येणार आहे की नाही. खरेदी केल्यास त्यासाठी औरंगाबादची धावपट्टी वापरणार काय, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. 

का हवे होते औरंगाबादला केंद्र३०० ते ४५० कि़ मी. परिसर औरंगाबाद येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा व पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग यामुळे नियंत्रित होऊ शकतो; परंतु २०० कि़मी.च्या अंतरातच सोलापूरमधून प्रयोग होणार आहे. त्यामुळे मराठवाड्याला त्याचा फारसा लाभ होणार नाही,असे मत  हवामानतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

आयआयटीएमने सांगितलेआयआयटीएम पुण्याचे जनसंपर्क अधिकारी शिवसाई दीक्षित यांनी सांगितले, विमान औरंगाबादच्या विमानतळावर थांबण्याबाबत निर्णय झाला आहे. औरंगाबाद येथून कृत्रिम प्रयोगासाठी फक्त उड्डाण होईल. सध्या विमान बारामतीमध्ये आहे. सिल्व्हर कोटेड सिलिंडर कुठे ठेवणार, विमान औरंगाबादेतून उडताना सिलिंडर फोडणार की नाही. याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे दीक्षित यांनी सांगितले.  

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळRainपाऊसState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा