शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कृत्रिम पाऊस पश्चिम महाराष्ट्रात; विमानाचा थांबा मराठवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:31 IST

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारल्यानंतर आता पुन्हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शासनाकडून झाला आहे

ठळक मुद्देसोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग आगामी चार महिन्यांसाठी केला जाणारवापरण्यात येणारे विमान मात्र औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेईल.

- विकास राऊत 

औरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारल्यानंतर आता पुन्हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शासनाकडून झाला आहे. सोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग आगामी चार महिन्यांसाठी केला जाणार असून, त्यासाठी वापरण्यात येणारे विमान मात्र औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेईल. ज्या दिवशी प्रयोग नसेल, त्या दिवशी विमान येथेच थांबेल.

केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर व परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग ३ जुलैपासून सुरू झाला आहे. २५० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात आली असून, त्यातून दोन विमानांची खरेदी देखील करण्यात येणार आहे. ती विमाने कोणत्या विमानतळावर थांबतील, याबाबत अद्याप काहीही सूचना नाहीत. 

सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्य छायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले आहे. जून २०१५ मध्ये मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पावसाचा प्रयोग) करण्यात आला होता. त्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होते. २७ कोटींचा खर्च त्यासाठी झाला होता. ख्याती वेदर मॉडिफि केशन या कंपनीला तीन वर्षांपूर्वी कंत्राट दिले होते. आता तीच कंपनी सोलापूर परिसरात प्रयोग करणार आहे. 

पुण्यातील भौतिकशास्त्र तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, मुळात सोलापूरला केंद्र स्थापन करणे हे भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नाही. ३ जुलैपासून सोलापूर येथून कृ त्रिम पावसाचा प्रयोग सुरू झाला आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र एका राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे असल्याचे ते म्हणाले.

या प्रश्नाची उत्तरे मिळेनात प्रयोगासाठी वापरण्यात येणारी स्फोटके कुठे ठेवणार, सोलापूर परिसरात प्रयोग केल्यानंतर विमान औरंगाबादेत थांबल्यानंतर उड्डाण घेताना मराठवाड्यातही सिलव्हर कोटेड सिलिंडर हवेत सोडणार की फक्त उड्डाण घेणार. विमान यावर्षी खरेदी करण्यात येणार आहे की नाही. खरेदी केल्यास त्यासाठी औरंगाबादची धावपट्टी वापरणार काय, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. 

का हवे होते औरंगाबादला केंद्र३०० ते ४५० कि़ मी. परिसर औरंगाबाद येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा व पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग यामुळे नियंत्रित होऊ शकतो; परंतु २०० कि़मी.च्या अंतरातच सोलापूरमधून प्रयोग होणार आहे. त्यामुळे मराठवाड्याला त्याचा फारसा लाभ होणार नाही,असे मत  हवामानतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

आयआयटीएमने सांगितलेआयआयटीएम पुण्याचे जनसंपर्क अधिकारी शिवसाई दीक्षित यांनी सांगितले, विमान औरंगाबादच्या विमानतळावर थांबण्याबाबत निर्णय झाला आहे. औरंगाबाद येथून कृत्रिम प्रयोगासाठी फक्त उड्डाण होईल. सध्या विमान बारामतीमध्ये आहे. सिल्व्हर कोटेड सिलिंडर कुठे ठेवणार, विमान औरंगाबादेतून उडताना सिलिंडर फोडणार की नाही. याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे दीक्षित यांनी सांगितले.  

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळRainपाऊसState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा