शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

समृद्धी महामार्गावरील संमोहनावर कृत्रिम फुलांचा ताटवा; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

By विकास राऊत | Updated: December 4, 2023 12:47 IST

नैसर्गिक फुलझाडे केव्हा वाढतील? आता ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊ नये, यासाठी आर्टिफिशियल वृक्ष-फुलांची भर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर वैजापूर ते सिंदखेडराजापर्यंत नैसर्गिकऐवजी आर्टिफिशियल फुलझाडांसह कोरीव दगडांच्या सजावटीचे काम हाती घेण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या ‘रोड हिप्नॉटीझम’ला कोट्यवधी खर्चून कृत्रिम फुलांमार्फत ब्रेक लावण्याचा हा उपक्रम आहे. वृक्षारोपणदेखील वर्षभरापासून सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

समृद्धीचे ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण झाले. तेव्हापासून आजवर महामार्गावर झालेल्या अपघातांमुळेच हा मार्ग चर्चेत राहिला. मार्गाच्या आजू-बाजूला काहीही वृक्षवल्ली, हिरवळ चालकांना दिसत नसल्यामुळे ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊन अपघात होत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी मध्यंतरी काढला. आता नैसर्गिक हिरवळ तत्काळ वाढून मोठी होणे शक्य नसल्यामुळे हा कृत्रिम उपाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे. त्यासाठी विविध प्रकारची शिल्प मार्गावर उभारण्यात येणार आहेत. महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी याची मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे.

रात्रीच्या प्रवासासाठी रिफ्लेक्टर वाढविले आहेत. रात्री प्रवासासाठी महामार्गावर माहितीचे रिफ्लेट बोर्ड आहेत. रस्ता संमोहन (‘रोड हिप्नॉटीझम’) होत असल्यामुळे रबलिंग सिप टाकल्या आहेत. दर टोल प्लाझाच्या प्रवेशावर १५ कि.मी. अंतरात ते टाकल्यामुळे चालक अलर्ट होतो. त्यात आता ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊ नये, यासाठी आर्टिफिशियल वृक्ष-फुलांची भर पडणार आहे.

कोण आहे कंत्राटदार....हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गणराज डेव्हलपर्स यांना या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. शहरातील शिल्पकार मेघराज शेळके यांना वैजापूर ते सिंदखेड राजापर्यंत काम करण्यासाठी उपकंत्राटदार म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान, शेळके यांनी सांगितले, आर्टिफिशियल फुले, झाडांमुळे प्रवास करताना फायदा होईल. अपघात होऊच नयेत, यासाठी हा प्रयोग हाती घेतला आहे.

समृद्धीने घेतले १२५ बळी...समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील ५०२ कि.मी.चे लोकार्पण होऊन ११ महिने, तर दुसऱ्या टप्प्यातील ८० कि.मी. मार्गाचे लोकार्पण होऊन सात महिने झाले आहेत. या ११ महिन्यांत महामार्गावर सर्व मिळून १२८५ अपघात झाले असून, त्यात सुमारे १२५ जणांचा बळी गेला आहे. सुरुवातीला टायर फुटून अपघात वाढल्यामुळे ताशी वेगाची १५० ही मर्यादा १२० वर आणली गेली. नायट्रोजन हवेचे सेंटर्स सुरू केले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात