शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील संमोहनावर कृत्रिम फुलांचा ताटवा; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

By विकास राऊत | Updated: December 4, 2023 12:47 IST

नैसर्गिक फुलझाडे केव्हा वाढतील? आता ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊ नये, यासाठी आर्टिफिशियल वृक्ष-फुलांची भर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर वैजापूर ते सिंदखेडराजापर्यंत नैसर्गिकऐवजी आर्टिफिशियल फुलझाडांसह कोरीव दगडांच्या सजावटीचे काम हाती घेण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या ‘रोड हिप्नॉटीझम’ला कोट्यवधी खर्चून कृत्रिम फुलांमार्फत ब्रेक लावण्याचा हा उपक्रम आहे. वृक्षारोपणदेखील वर्षभरापासून सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

समृद्धीचे ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण झाले. तेव्हापासून आजवर महामार्गावर झालेल्या अपघातांमुळेच हा मार्ग चर्चेत राहिला. मार्गाच्या आजू-बाजूला काहीही वृक्षवल्ली, हिरवळ चालकांना दिसत नसल्यामुळे ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊन अपघात होत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी मध्यंतरी काढला. आता नैसर्गिक हिरवळ तत्काळ वाढून मोठी होणे शक्य नसल्यामुळे हा कृत्रिम उपाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे. त्यासाठी विविध प्रकारची शिल्प मार्गावर उभारण्यात येणार आहेत. महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी याची मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे.

रात्रीच्या प्रवासासाठी रिफ्लेक्टर वाढविले आहेत. रात्री प्रवासासाठी महामार्गावर माहितीचे रिफ्लेट बोर्ड आहेत. रस्ता संमोहन (‘रोड हिप्नॉटीझम’) होत असल्यामुळे रबलिंग सिप टाकल्या आहेत. दर टोल प्लाझाच्या प्रवेशावर १५ कि.मी. अंतरात ते टाकल्यामुळे चालक अलर्ट होतो. त्यात आता ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊ नये, यासाठी आर्टिफिशियल वृक्ष-फुलांची भर पडणार आहे.

कोण आहे कंत्राटदार....हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गणराज डेव्हलपर्स यांना या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. शहरातील शिल्पकार मेघराज शेळके यांना वैजापूर ते सिंदखेड राजापर्यंत काम करण्यासाठी उपकंत्राटदार म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान, शेळके यांनी सांगितले, आर्टिफिशियल फुले, झाडांमुळे प्रवास करताना फायदा होईल. अपघात होऊच नयेत, यासाठी हा प्रयोग हाती घेतला आहे.

समृद्धीने घेतले १२५ बळी...समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील ५०२ कि.मी.चे लोकार्पण होऊन ११ महिने, तर दुसऱ्या टप्प्यातील ८० कि.मी. मार्गाचे लोकार्पण होऊन सात महिने झाले आहेत. या ११ महिन्यांत महामार्गावर सर्व मिळून १२८५ अपघात झाले असून, त्यात सुमारे १२५ जणांचा बळी गेला आहे. सुरुवातीला टायर फुटून अपघात वाढल्यामुळे ताशी वेगाची १५० ही मर्यादा १२० वर आणली गेली. नायट्रोजन हवेचे सेंटर्स सुरू केले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात