शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत स्पर्धा परीक्षांमुळे कला शाखेस झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 13:40 IST

सर्वात कमी गुण मिळाल्यास कला शाखेला प्रवेश घेतला जातो. असा सर्वसाधारणपणे समज असतो. मात्र प्रशासनात अधिकारी होण्याच्या क्रेझमुळे हा ट्रेंड बदलत चालल्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत येत आहे.

ठळक मुद्देदहावीत ९० टक्के आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी कला शाखेला प्रवेश घेत आहेत.

औरंगाबाद : सर्वात कमी गुण मिळाल्यास कला शाखेला प्रवेश घेतला जातो. असा सर्वसाधारणपणे समज असतो. मात्र प्रशासनात अधिकारी होण्याच्या क्रेझमुळे हा ट्रेंड बदलत चालल्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत येत आहे. दहावीत ९० टक्के आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थीकला शाखेला प्रवेश घेत आहेत. यामागे स्पर्धा परीक्षांची तयारी असल्याचे मत प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्राध्यापक, प्राचार्यांनी व्यक्त केले.

दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांचा पहिला पसंतीक्रम हा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा असतो. त्यानंतर अभियांत्रिकी, इतर व्यावसायिक अभ्यासक्रम, वाणिज्य असा राहतो. सर्वात शेवटी कला शाखेचा विचार होतो. मात्र स्पर्धा परीक्षांची वाढलेली क्रेझ आणि त्यासाठी होणारी स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती देणे सुरू केले आहे. यात कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाला १२ वीत विज्ञान, वाणिज्य शाखेला ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्र या विषयांना सर्वाधिक प्राधान्य दिले. या विषयांचा फायदा एमपीएससी, यूपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. तसेच या स्पर्धा परीक्षेचा बदललेल्या अभ्यासक्रमांमध्ये याच विषयांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आल्यामुळे ज्यांना अधिकारी बनायचे आहे. त्यांचा ओढा याकडे अधिक असल्याचे निरीक्षण देवगिरीचे उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी नोंदविले. याच वेळी दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी कला शाखेला प्राधान्य दिले आहे. यातही अकरावीत कला शाखेत इंग्रजी माध्यमाचा प्रतिसाद मोठा असल्याचे मत स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. 

स्पर्धा परीक्षांची तयारी हेच कारणविज्ञान, वाणिज्य शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात कला शाखेला प्राधान्य देत आहेत. इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास विषयाची निवड करीत आहेत. यामागे स्पर्धा परीक्षांची तयारी हेच कारण आहे. - डॉ. दिलीप खैरनार, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय

गुणवंत विद्यार्थी ठरवून कला शाखेत अकरावी कला शाखेला ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेले विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. यात कला शाखेत प्रवेश घेताना विद्यार्थी इंग्रजी माध्यमाची निवड करीत आहे. यामागे विद्यार्थ्यांची भावना ही इंग्रजी अवघड वाटू नये. इंग्रजी माध्यमाविषयी असणारी भीती दूर व्हावी आणि  आगामी शिक्षणात कोठेही इंग्रजीचा अडसर निर्माण होऊ नये, अशी आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थी ठरवून कला शाखेला प्राधान्य देत आहेत.- प्रा. संजय गायकवाड, उपप्राचार्य, उच्च माध्यमिक,  स. भु. कला महाविद्यालय

आवड जपण्याचा प्रयत्न अकरावी कला शाखेतील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आवड असणाऱ्या विषयात पुढे उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी ही निवड केली. माझ्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी प्राधान्यक्रम तर दिला नाही, उलट माझी आवड जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी कला शाखेची निवड केली आहे.- गायत्री कुलकर्णी, विद्यार्थिनी (दहावीत ९४ टक्के गुण)

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयartकलाAurangabadऔरंगाबाद