शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:52 IST

जाधववाडी कृउबातील ७० टक्के उलाढाल मक्यावर अवलंबून 

ठळक मुद्देराज्यात मक्याचे सर्वाधिक उत्पादन औरंगाबाद जिल्ह्यात घेतले जाते. खरीप हंगामात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर पिकांची लागवड केली जाते.

औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने जगात थैमान घातले आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातही मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात ४० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्याच्या अडत बाजारातील खरिपातील एकूण उलाढालीपेक्षा ७० टक्के उलाढाल मक्यावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबर अडत व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

राज्यात मक्याचे सर्वाधिक उत्पादन औरंगाबाद जिल्ह्यात घेतले जाते. खरीप हंगामात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी ३ लाख ८५ हजार ते ४ लाख ३८ हजार हेक्टरवर कपाशी, तर १ लाख ३५ हजार ते १ लाख ८६ हजार हेक्टरदरम्यान मक्याची लागवड होते. कपाशीनंतर दोन नंबरचे पीक म्हणजे मका होय. या दोन पिकांवरच जिल्ह्यातील कृषी क्षेत्र अवलंबून आहे. सततच्या दुष्काळामुळे मक्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने मक्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी मक्यावर अवलंबून असलेल्या जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारात चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथून देशातच नव्हे, तर विदेशात मका निर्यात होत असते. 

२००८-२००९ या वर्षी जाधववाडीतून रेल्वेचे ४५ रॅक (एका रॅकमध्ये ४५ हजार पोती) म्हणजे १८ लाख पोती मका मुंबईला पाठविण्यात आली होती. तेथून अमेरिकेलाही मका निर्यात झाली. त्यावेळेस अमेरिकेत मक्याचे उत्पादन घटले होते. ते वर्ष शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी चांगले राहिले होते. मात्र, मागील चार वर्षांत सतत मक्याची आवक घटत आहे. कृृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१५-२०१६ या खरीप हंगामात १ लाख १२ हजार ८९१ क्विंटल मक्याची आवक झाली होती. त्यानंतर दुष्काळाने सतत मक्याची आवक घटत गेली.

मागील वर्षी २०१८-२०१९ मध्ये ३८ हजार ६०० क्विंटल मक्याची आवक झाली.  दुष्काळाचा मोठा फटका मका उत्पादनाला झाला होता. ई-नाम योजनेमुळे रोख रक्कम शेतकऱ्यांना मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी जालना अडत बाजारात मका विकली होती. त्याचाही मोठा फटका येथील अडत बाजाराला बसला होता. सध्या लष्करी अळीची चर्चा फक्त बांधावरच नव्हे, तर अडत बाजारातही होत आहे. व्यापारीही शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, मका पिकाची माहिती घेत आहेत. ४यंदा लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे १० हजार पोती मका तरी अडत बाजारात येईल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे अडत्यांना व खरेदीदारांना परराज्यातील धान्य विक्री करून आपला व्यवसाय चालवावा लागणार आहे. 

कृउबात मागील ४ वर्षांतील मक्याची आवक  वर्ष     आवक (क्विंटल)२०१५-२०१६     १ लाख १२ हजार ८९१ २०१६-२०१७    १ लाख २१ हजार २१३२०१७-२०१८    ६० हजार ८२५२०१८-२०१९    ३८ हजार ६००

परपेठेतील माल विक्रीशिवाय नाही पर्याय जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य अडत बाजारात खरिपातील ७० टक्के उलाढाल केवळ मक्यावर अवलंबून असते. मात्र, सातत्याने मक्याच्या आवकमध्ये घट होत आहे. ई-नाम योजनेमुळे येथे शेतकऱ्यांना रोख रक्कम देता येत नाही. जिल्ह्यातील शेतकरी जालना कृउबात जाऊन मका विकत असल्याने त्याचाही मोठा फटका येथील आवकवर झाला आहे. यंदा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मक्याचे ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होईल, असे सांगितले जात आहे. यामुळे आता परपेठेतील धान्य विक्री करण्याशिवाय येथील अडत्या व खरेदीदारांना पर्याय राहिला नाही.   - कन्हैयालाल जैस्वाल, अध्यक्ष, अडत व्यापारी संघटना 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र