शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:52 IST

जाधववाडी कृउबातील ७० टक्के उलाढाल मक्यावर अवलंबून 

ठळक मुद्देराज्यात मक्याचे सर्वाधिक उत्पादन औरंगाबाद जिल्ह्यात घेतले जाते. खरीप हंगामात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर पिकांची लागवड केली जाते.

औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने जगात थैमान घातले आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातही मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात ४० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्याच्या अडत बाजारातील खरिपातील एकूण उलाढालीपेक्षा ७० टक्के उलाढाल मक्यावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबर अडत व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

राज्यात मक्याचे सर्वाधिक उत्पादन औरंगाबाद जिल्ह्यात घेतले जाते. खरीप हंगामात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी ३ लाख ८५ हजार ते ४ लाख ३८ हजार हेक्टरवर कपाशी, तर १ लाख ३५ हजार ते १ लाख ८६ हजार हेक्टरदरम्यान मक्याची लागवड होते. कपाशीनंतर दोन नंबरचे पीक म्हणजे मका होय. या दोन पिकांवरच जिल्ह्यातील कृषी क्षेत्र अवलंबून आहे. सततच्या दुष्काळामुळे मक्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने मक्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी मक्यावर अवलंबून असलेल्या जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारात चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथून देशातच नव्हे, तर विदेशात मका निर्यात होत असते. 

२००८-२००९ या वर्षी जाधववाडीतून रेल्वेचे ४५ रॅक (एका रॅकमध्ये ४५ हजार पोती) म्हणजे १८ लाख पोती मका मुंबईला पाठविण्यात आली होती. तेथून अमेरिकेलाही मका निर्यात झाली. त्यावेळेस अमेरिकेत मक्याचे उत्पादन घटले होते. ते वर्ष शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी चांगले राहिले होते. मात्र, मागील चार वर्षांत सतत मक्याची आवक घटत आहे. कृृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१५-२०१६ या खरीप हंगामात १ लाख १२ हजार ८९१ क्विंटल मक्याची आवक झाली होती. त्यानंतर दुष्काळाने सतत मक्याची आवक घटत गेली.

मागील वर्षी २०१८-२०१९ मध्ये ३८ हजार ६०० क्विंटल मक्याची आवक झाली.  दुष्काळाचा मोठा फटका मका उत्पादनाला झाला होता. ई-नाम योजनेमुळे रोख रक्कम शेतकऱ्यांना मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी जालना अडत बाजारात मका विकली होती. त्याचाही मोठा फटका येथील अडत बाजाराला बसला होता. सध्या लष्करी अळीची चर्चा फक्त बांधावरच नव्हे, तर अडत बाजारातही होत आहे. व्यापारीही शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, मका पिकाची माहिती घेत आहेत. ४यंदा लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे १० हजार पोती मका तरी अडत बाजारात येईल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे अडत्यांना व खरेदीदारांना परराज्यातील धान्य विक्री करून आपला व्यवसाय चालवावा लागणार आहे. 

कृउबात मागील ४ वर्षांतील मक्याची आवक  वर्ष     आवक (क्विंटल)२०१५-२०१६     १ लाख १२ हजार ८९१ २०१६-२०१७    १ लाख २१ हजार २१३२०१७-२०१८    ६० हजार ८२५२०१८-२०१९    ३८ हजार ६००

परपेठेतील माल विक्रीशिवाय नाही पर्याय जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य अडत बाजारात खरिपातील ७० टक्के उलाढाल केवळ मक्यावर अवलंबून असते. मात्र, सातत्याने मक्याच्या आवकमध्ये घट होत आहे. ई-नाम योजनेमुळे येथे शेतकऱ्यांना रोख रक्कम देता येत नाही. जिल्ह्यातील शेतकरी जालना कृउबात जाऊन मका विकत असल्याने त्याचाही मोठा फटका येथील आवकवर झाला आहे. यंदा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मक्याचे ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होईल, असे सांगितले जात आहे. यामुळे आता परपेठेतील धान्य विक्री करण्याशिवाय येथील अडत्या व खरेदीदारांना पर्याय राहिला नाही.   - कन्हैयालाल जैस्वाल, अध्यक्ष, अडत व्यापारी संघटना 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र