शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

'अर्जुन बाण' भात्यात; खोतकरांकडे 'अम्पायर'ची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 21:06 IST

अर्जुन खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय धुडकवून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केल्यास जालना लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होईल, यात शंका नाही.

औरंगाबाद - राज्यात आघाडीच्या राजकीय पक्षांच्या पदरात काही ना काही टाकणाऱ्या जालना जिल्ह्याचे राजकारण लोकसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जालन्याच्या राजकारणात कोणत्या ना कोणत्या मार्गाने सत्तेत असलेले शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आमने-सामने उभे ठाकले होते. परंतु या संघर्षाच्या स्थितीत शिवसेना नेतृत्वाने अर्जुन खोतकर यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची जबाबदारी सोपवून एकप्रकारे फॉर्मात असलेल्या खेळाडूला पंच म्हणून नियुक्त केले. त्यामुळे दानवे-खोतकर संघर्ष मावळल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खोतकर आणि दानवे यांचं वैर सर्वांनाच ठावूक आहे. परंतु राज्यात मोठा भाऊ ठरलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे रावसाहेब दानवे मागील पाच वर्षात राज्य पातळीवर पॉवरफुल झाले आहेत. याउलट खोतकर यांना जालना विधानसभा जिंकण्यासाठी करावा लागलेला संघर्ष सर्वश्रूतच आहे. अशा परिस्थितीत देखील खोतकर यांनी दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. परंतु निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला होता. अखेरीस खोतकर यांच्या वाट्याला अम्पायरची अर्थात समन्वयकाची जबाबदारी आली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना पक्षांनी ताळमेळ व्यवस्थीत असावा यासाठी राज्यातील विविध विभागांसाठी समन्वयकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या समन्वयकपदी अर्जुन खोतकर आणि भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भवितव्यासंदर्भातील निर्णय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे अर्जुन खोतकर यांचा बाण पुन्हा भात्यात, अशी काहीशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. किंबहुना उद्धव यांनी खोतकर यांच्या संदर्भात हाच निर्णय दिला, अशी शक्यता आहे.

खोतकर-बच्चू कडू येणार सोबत ?गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या तुरीवरून वादग्रस्त वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी अपक्ष आमदार बच्चू कडू आक्रमक आहेत. त्यात दानवेविरोधात अर्जुन खोतकर यांनी सूर काढल्याने दानवे यांच्यासाठी यंदाची निवडणूक खडतर ठरेल असा अंदाज होता. बच्चू कडू यांनी देखील दानवे यांना पाडण्यासाठी खोतकर यांच्याशी हात मिळवणी करू, असे म्हटले होते. परंतु खोतकरच मागे फिरल्याने दानवे यांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय धुडकवून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केल्यास जालना लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होईल, यात शंका नाही.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९