शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

'अर्जुन बाण' भात्यात; खोतकरांकडे 'अम्पायर'ची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 21:06 IST

अर्जुन खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय धुडकवून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केल्यास जालना लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होईल, यात शंका नाही.

औरंगाबाद - राज्यात आघाडीच्या राजकीय पक्षांच्या पदरात काही ना काही टाकणाऱ्या जालना जिल्ह्याचे राजकारण लोकसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जालन्याच्या राजकारणात कोणत्या ना कोणत्या मार्गाने सत्तेत असलेले शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आमने-सामने उभे ठाकले होते. परंतु या संघर्षाच्या स्थितीत शिवसेना नेतृत्वाने अर्जुन खोतकर यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची जबाबदारी सोपवून एकप्रकारे फॉर्मात असलेल्या खेळाडूला पंच म्हणून नियुक्त केले. त्यामुळे दानवे-खोतकर संघर्ष मावळल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खोतकर आणि दानवे यांचं वैर सर्वांनाच ठावूक आहे. परंतु राज्यात मोठा भाऊ ठरलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे रावसाहेब दानवे मागील पाच वर्षात राज्य पातळीवर पॉवरफुल झाले आहेत. याउलट खोतकर यांना जालना विधानसभा जिंकण्यासाठी करावा लागलेला संघर्ष सर्वश्रूतच आहे. अशा परिस्थितीत देखील खोतकर यांनी दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. परंतु निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला होता. अखेरीस खोतकर यांच्या वाट्याला अम्पायरची अर्थात समन्वयकाची जबाबदारी आली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना पक्षांनी ताळमेळ व्यवस्थीत असावा यासाठी राज्यातील विविध विभागांसाठी समन्वयकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या समन्वयकपदी अर्जुन खोतकर आणि भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भवितव्यासंदर्भातील निर्णय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे अर्जुन खोतकर यांचा बाण पुन्हा भात्यात, अशी काहीशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. किंबहुना उद्धव यांनी खोतकर यांच्या संदर्भात हाच निर्णय दिला, अशी शक्यता आहे.

खोतकर-बच्चू कडू येणार सोबत ?गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या तुरीवरून वादग्रस्त वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी अपक्ष आमदार बच्चू कडू आक्रमक आहेत. त्यात दानवेविरोधात अर्जुन खोतकर यांनी सूर काढल्याने दानवे यांच्यासाठी यंदाची निवडणूक खडतर ठरेल असा अंदाज होता. बच्चू कडू यांनी देखील दानवे यांना पाडण्यासाठी खोतकर यांच्याशी हात मिळवणी करू, असे म्हटले होते. परंतु खोतकरच मागे फिरल्याने दानवे यांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय धुडकवून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केल्यास जालना लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होईल, यात शंका नाही.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९