शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

देवगिरी किल्ल्यावर भीषण आगीनंतर पुरातत्त्व विभागाला जाग; सर्वेक्षणानंतर करणार उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:10 IST

देवगिरी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता व व्याप्ती अधिक होती.

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यावरील झाडाझुडपांना मंगळवारी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने अखेर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला जाग आली आहे. या किल्ल्यावर आगीच्या घटना कायमच्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यादृष्टीने बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले.

देवगिरी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता व व्याप्ती अधिक होती. या भीषण घटनेने ऐतिहासिक किल्ला धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे यंत्रणेच्या कारभाराविषयी सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. किल्ल्यावर ३० अग्निशमन सिलिंडर असल्याचा दावा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून करण्यात येतो, परंतु मंगळवारच्या घटनेनंतर आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी पाऊल टाकण्यात आले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे संरक्षण सहायक संजय रोहणकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी किल्ल्यावर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून पाण्याच्या टाक्या, अग्निशमन यंत्रणेसह आवश्यक बाबींवर प्राधान्याने काम करण्यात येणार आहे.

सर्वत्र काळी राखआगीच्या घटनेने किल्ल्याच्या परिसरात सर्वत्र काळी राख पाहायला मिळत आहे. ही स्थिती पाहून पर्यटक, इतिहास प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या गोष्टींचा विचार आवश्यक- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने विशेष सुरक्षा आराखडा तयार करावा.- उन्हाळ्यात कोरडे गवत सहज पेट घेते. त्यामुळे किल्ल्याच्या आसपासच्या भागात नियमितपणे गवत-कचरा काढणे आवश्यक.- गवत, कचऱ्यापासून ‘सेंद्रिय खत निर्मिती’ होऊ शकते, याची चाचपणी करावी.- कायमस्वरूपी आग प्रतिबंधक पथकाची स्थापना करावी.- उन्हाळ्यात पर्यटन हंगामात, विशेषतः एप्रिल ते जूनदरम्यान स्थायी अग्निशमन पथक तैनात करावे.- सीसीटीव्ही वॉच टॉवर्समधून देखरेख ठेवणे.- किल्ल्यावर धूम्रपान, प्लॅस्टिक वा इतर वस्तू जाळणे, अशा गोष्टींवर सक्तीने बंदी. प्रवेशद्वारावर हवी तपासणी.- दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करणे.- स्वयंसेवी संस्था, ट्रेकिंग ग्रुप यांना ‘फायर वॉच वॉलंटियर्स’ म्हणून प्रशिक्षित करता येईल.- नागरिकांत जनजागृती मोहिमा राबवता येतील.- अग्निशमन विभागाशी समन्वय.- जवळच्या फायर स्टेशनमध्ये विशेष युनिट तयार करणे.- किल्ल्याच्या पायथ्याशी व ठिकठिकाणी पाण्याची टाकी व पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर्स ठेवल्यास आग नियंत्रणात आणता येते.

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटन