शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला मंजूर पीटलाईन जालन्याला पळवली ? फौजिया खान यांनी मंजुरीचे पत्र केले ट्विट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 11:57 IST

Aurangabad Railway Pitline : कॅबिनेट मंत्र्यांनी मंजूर केलेली पीटलाइन रेल्वे राज्यमंत्र्यांनी जालन्याला पळविल्याचा संशय, घोषणा होण्यापूर्वी ६ दिवसांआधीच चिकलठाण्यात पीटलाइन मंजूर झाल्याचा पत्रात उल्लेख

औरंगाबाद : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांनी जालन्याला पीटलाइन करण्याची घोषणा २ जानेवारी रोजी केली. मात्र, त्यापूर्वीच औरंगाबादेतील चिकलठाणा रेल्वेस्टेशनवर पीटलाइन टाकण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishanav ) यांनी मंजूर केल्याचे समोर आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी औरंगाबादेत मंजूर केलेली पीटलाइन ( Aurangabad Railway Pitline ) रेल्वे राज्यमंत्र्यांनी जालन्याला पळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आता केला जात आहे. असे असले तरी, ही पीटलाइन नेमकी कोठे होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

खा. डॉ. फौजिया खान यांनी रेल्वे मंत्रालयास लिहिलेल्या पत्राला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या लेखी उत्तरात ही बाब स्पष्ट झाली. दि. २८ डिसेंबरपर्यंत औरंगाबादेतील चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर होती. अवघ्या ६ दिवसांत औरंगाबादची पीटलाइन जालन्याला वळविल्याचे दिसते आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. डाॅ. फौजिया खान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या औरंगाबाद आणि लातूर येथे पीटलाइनची आवश्यकता नाही. नांदेड व पूर्णेत रेल्वे बोगीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुविधा आहे. त्या या परिसरातील रेल्वे समस्यासाठी पुरेशा आहेत. भविष्यातील गरज लक्षात घेता औरंगाबादपासून १० कि.मी. अंतरावरील चिकलठाण्यात पीटलाइन निर्मितीच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. फौजिया खान यांनी शुक्रवारी हे पत्र ट्विट केले. औरंगाबादेत अनेक वर्षांपासून पीटलाइनची मागणी आहे. चिकलठाण्यात पीटलाइन तयार करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. असे असतानाही अवघ्या ६ दिवसांत पीटलाइन जालन्याला वळविण्याचा निर्णय कसा काय झाला, पीटलाइन नेमकी कुठे होणार, जालना की औरंगाबाद असा सवाल रेल्वे संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

काय घडले नेमके ?-२८ डिसेंबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे चिकलठाण्यात पीटलाइन मंजूर असल्याचे पत्र.- २ जानेवारी रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालन्यात पीटलाइनची घोषणा.- २ जानेवारी रोजी औरंगाबादेतही पीटलाइनची मागणी करू, अशी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची भूमिका.- ७ जानेवारी रोजी खा. फौजिया खान यांचे ट्विट. चिकलठाण्यात पीटलाइन मंजूर केल्याची दिली माहिती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादraosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाNandedनांदेडrailwayरेल्वे