शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उत्सुकता संपली; सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:04 IST

राजकीय समीकरणातून जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्यामुळे नियुक्ती होण्यात विलंब झाल्याचे पुढे आले होते.

ठळक मुद्देपाच पेक्षा अधिक नावे होती चर्चेत चव्हाण औरंगाबाद येथेच महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते

औरंगाबाद : महावितरणचे औरंगाबाद येथे कार्यरत सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीत राजकीय लॉबिंग होत असल्याची चर्चा रंगल्याने जिल्हाधिकारी पदी कोणाची नियुक्ती होईल याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मागील आठवड्यात उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिवपदी बदली  झाल्यानंतर जिल्हाधिकारी पद रिक्त होते.  

राजकीय समीकरणातून जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्यामुळे नियुक्ती होण्यात विलंब झाल्याचे पुढे आले होते. या पदासाठी पाचहून अधिक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यात महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, प्रेरणा देशभ्रतार, जे. श्रीकांत, एम.डी. सिंग, औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची मुख्य नावे होती. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत तसेच इतर निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हाधिकारी उपयुक्त ठरावे असे शिवसेना नेत्यांना वाटत होते. यामुळे जिल्हाधिकारीपदासाठी कोण असावे, यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेची नेतेमंडळी प्रयत्नशील होते. तसेच सरकारमधील इतर दोन पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचेही मत विचारात घ्यावे लागणार असल्याने नियुक्ती लांबत होती. अखेर चव्हाण यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

मनपा आयुक्तांचेही नाव होते चर्चेतबुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी कुणाची नियुक्ती करायची, याबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांत चर्चा झाली. त्यामध्ये मनपा प्रशासक आस्तिकुमार पाण्डेय यांचे नावही पुढे आले होते. परंतु, ते आयुक्तपदी येऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोना काळात प्रभारी जिल्हाधिकारी काम करत होतेबदली, नियुक्ती ही प्रशासकीय बाब असली तरी पहिल्यांदाच जिल्हाधिकारीपदासाठी राजकीय आणि प्रशासकीय लॉबिंग सुरू झाले होते. मात्र, जिल्ह्याच्या  ३०८ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात अद्यापही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. किंबहुना ती अधिक बिघडण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत प्रभारी जिल्हाधिकारी काम करीत होते.  दरम्यान, जिल्ह्यात १८ हजारांच्या पुढे कोरोनाग्रस्तांचा आकडा सरकला, ग्रामीण भागात ५ हजार ७०० रुग्ण आहेत. यामुळे जिल्हाधिकारी नियुक्तीला होत असलेल्या विलंबाबद्दल नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTransferबदलीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद