शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

उत्सुकता संपली; सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:04 IST

राजकीय समीकरणातून जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्यामुळे नियुक्ती होण्यात विलंब झाल्याचे पुढे आले होते.

ठळक मुद्देपाच पेक्षा अधिक नावे होती चर्चेत चव्हाण औरंगाबाद येथेच महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते

औरंगाबाद : महावितरणचे औरंगाबाद येथे कार्यरत सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीत राजकीय लॉबिंग होत असल्याची चर्चा रंगल्याने जिल्हाधिकारी पदी कोणाची नियुक्ती होईल याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मागील आठवड्यात उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिवपदी बदली  झाल्यानंतर जिल्हाधिकारी पद रिक्त होते.  

राजकीय समीकरणातून जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्यामुळे नियुक्ती होण्यात विलंब झाल्याचे पुढे आले होते. या पदासाठी पाचहून अधिक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यात महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, प्रेरणा देशभ्रतार, जे. श्रीकांत, एम.डी. सिंग, औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची मुख्य नावे होती. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत तसेच इतर निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हाधिकारी उपयुक्त ठरावे असे शिवसेना नेत्यांना वाटत होते. यामुळे जिल्हाधिकारीपदासाठी कोण असावे, यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेची नेतेमंडळी प्रयत्नशील होते. तसेच सरकारमधील इतर दोन पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचेही मत विचारात घ्यावे लागणार असल्याने नियुक्ती लांबत होती. अखेर चव्हाण यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

मनपा आयुक्तांचेही नाव होते चर्चेतबुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी कुणाची नियुक्ती करायची, याबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांत चर्चा झाली. त्यामध्ये मनपा प्रशासक आस्तिकुमार पाण्डेय यांचे नावही पुढे आले होते. परंतु, ते आयुक्तपदी येऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोना काळात प्रभारी जिल्हाधिकारी काम करत होतेबदली, नियुक्ती ही प्रशासकीय बाब असली तरी पहिल्यांदाच जिल्हाधिकारीपदासाठी राजकीय आणि प्रशासकीय लॉबिंग सुरू झाले होते. मात्र, जिल्ह्याच्या  ३०८ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात अद्यापही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. किंबहुना ती अधिक बिघडण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत प्रभारी जिल्हाधिकारी काम करीत होते.  दरम्यान, जिल्ह्यात १८ हजारांच्या पुढे कोरोनाग्रस्तांचा आकडा सरकला, ग्रामीण भागात ५ हजार ७०० रुग्ण आहेत. यामुळे जिल्हाधिकारी नियुक्तीला होत असलेल्या विलंबाबद्दल नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTransferबदलीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद