शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

खुशाल एसआयटी नियुक्त करा, पण निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे; मनोज जरांगेंची मागणी

By बापू सोळुंके | Updated: February 27, 2024 14:03 IST

मी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात आणि जवळचा नाही.

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी येथे झालेल्या पोलिसांवरील दगडफेकींच्या घटनेची एसआयटीमार्फत खुशाल चौकशी करा. पण ही चौकशी निपक्षपातीपणे करा आणि होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी अशी मागणी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली .

उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयात सोमवारी रात्रीपासून उपचार घेत आहेत. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या महिला आणि अबाल वृद्धांवर लाठीहल्ला आणि गोळीबार करणाऱ्या पोलिसांची ही चौकशी करावी अशी आमची मागणी केली. आपल्याला अडकवण्यासाठी षडयंत्र रचल्या जात असल्याचे तीन दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे समाजबांधवांना सांगितले होते. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवावर गुन्हे दाखल केले जात आहे हा. हे सरकार आता सत्तेचा दुरुपयोग करीत असता आरोप जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

मंत्र्यांची देखील चौकशी करालाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्या मंत्र्यांची देखील चौकशी करा, असे जरांगे पाटील म्हणाले . त्या काळात आम्हाला कोणी ,कोणी फोन केले आणि काय म्हणाले होते तेही एसआयटीला देतो असे ते म्हणाले. आम्ही दोन शिव्या घातल्या तर जिव्हारी लागले. आमच्या माय माऊलीवर लाट्या चालवल्या गोळीबार केला तेव्हा आम्हाला कसे वाटले असेल? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला. तसेच देवेंद्र फडणवीस मराठा समाजासाठी आजपर्यंत काय काय केले हे सांगत आहेत त्यांनी फक्त मराठा समाजाला दिले का इतर समाजाला दिले त्याचं काय मागील 70 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय ते दिले नाही आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय राहणार नाही. 

तरी मागे हटणार नाहीमराठा समाजाने तुमचा मुलगा म्हणून माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजाला केले. मी कुणाचा एक रुपयाही घेतलेला नाही यामुळे यांनी कितीही एसआयटी नेमल्या तरी काही फरक पडणार नाही. समाजासाठी लढताना मला जेलमध्ये जावे लागले. तरी मी मागे हटणार नाही. एवढेच नव्हे जातीसाठी माझा मृत्यू झाला तरी तो मी आनंदाने स्वीकारेल असेही जरांगे म्हणाले.

आरक्षणाविरुद्ध बोलणाऱ्यास सोडणार नाही मागील सहा महिन्यात फडणवीस विरुद्ध मी बोललो नाही पण ते आता खुनशीपणाने वागत असल्याचे दिसल्याने त्यांच्या विरोधात बोललो. मी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात आणि जवळचा नाही .जो मराठा आरक्षणाविरुद्ध बोलेल त्याला आपण सोडणार नाही .हा आपला नियम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलन संपलेले नाही तीन मार्च रोजी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद