शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

खुशाल एसआयटी नियुक्त करा, पण निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे; मनोज जरांगेंची मागणी

By बापू सोळुंके | Updated: February 27, 2024 14:03 IST

मी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात आणि जवळचा नाही.

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी येथे झालेल्या पोलिसांवरील दगडफेकींच्या घटनेची एसआयटीमार्फत खुशाल चौकशी करा. पण ही चौकशी निपक्षपातीपणे करा आणि होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी अशी मागणी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली .

उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयात सोमवारी रात्रीपासून उपचार घेत आहेत. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या महिला आणि अबाल वृद्धांवर लाठीहल्ला आणि गोळीबार करणाऱ्या पोलिसांची ही चौकशी करावी अशी आमची मागणी केली. आपल्याला अडकवण्यासाठी षडयंत्र रचल्या जात असल्याचे तीन दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे समाजबांधवांना सांगितले होते. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवावर गुन्हे दाखल केले जात आहे हा. हे सरकार आता सत्तेचा दुरुपयोग करीत असता आरोप जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

मंत्र्यांची देखील चौकशी करालाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्या मंत्र्यांची देखील चौकशी करा, असे जरांगे पाटील म्हणाले . त्या काळात आम्हाला कोणी ,कोणी फोन केले आणि काय म्हणाले होते तेही एसआयटीला देतो असे ते म्हणाले. आम्ही दोन शिव्या घातल्या तर जिव्हारी लागले. आमच्या माय माऊलीवर लाट्या चालवल्या गोळीबार केला तेव्हा आम्हाला कसे वाटले असेल? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला. तसेच देवेंद्र फडणवीस मराठा समाजासाठी आजपर्यंत काय काय केले हे सांगत आहेत त्यांनी फक्त मराठा समाजाला दिले का इतर समाजाला दिले त्याचं काय मागील 70 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय ते दिले नाही आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय राहणार नाही. 

तरी मागे हटणार नाहीमराठा समाजाने तुमचा मुलगा म्हणून माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजाला केले. मी कुणाचा एक रुपयाही घेतलेला नाही यामुळे यांनी कितीही एसआयटी नेमल्या तरी काही फरक पडणार नाही. समाजासाठी लढताना मला जेलमध्ये जावे लागले. तरी मी मागे हटणार नाही. एवढेच नव्हे जातीसाठी माझा मृत्यू झाला तरी तो मी आनंदाने स्वीकारेल असेही जरांगे म्हणाले.

आरक्षणाविरुद्ध बोलणाऱ्यास सोडणार नाही मागील सहा महिन्यात फडणवीस विरुद्ध मी बोललो नाही पण ते आता खुनशीपणाने वागत असल्याचे दिसल्याने त्यांच्या विरोधात बोललो. मी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात आणि जवळचा नाही .जो मराठा आरक्षणाविरुद्ध बोलेल त्याला आपण सोडणार नाही .हा आपला नियम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलन संपलेले नाही तीन मार्च रोजी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद