शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहा उमेदवारांचे अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:34 IST

तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता

ठळक मुद्देआता लक्ष माघारीकडे भाजप नगरसेवकांना आला ‘भाव’

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मैदानात सात जणांनी उमेदवारी अर्ज १ आॅगस्ट रोजी दाखल केले होते. अर्जांची शुक्रवारी छाननी केली असता विशाल नांदरकर यांचा अर्ज कागदपत्रांअभावी बाद ठरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आता वैध सहा अर्जांपैकी माघार कोण घेणार, याकडे लक्ष लागले आहे. किमान तीन उमेदवार माघार घेणार असल्याची चर्चा आहे. तसे झाले तर तिरंगी आणि दोन उमेदवारांनी माघार घेतली तर चौरंगी लढत होण्याचे संकेत आहेत. ५ आॅगस्ट उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. १९ आॅगस्ट रोजी मतदान होईल. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल.

निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. यामध्ये महायुतीकडून अंबादास दानवे, आघाडीचे बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी, नंदकिशोर सहारे, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख, तात्यासाहेब चिमणे, शहानवाज अब्दुल रहेमान खान यांचे अर्ज वैध ठरले आहेत. सहायक निवडणूक अधिकारी संजीव जाधवर यांच्याकडे अर्जांची छाननी करण्यात आली. 

दोन अपक्ष आणि दोन पक्षाचे उमेदवार अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता या मतदारसंघात सध्यातरी आहे. चौरंगी लढत झाल्यास युतीच्या उमेदवाराला फोडाफोडीच्या राजकारणाचा सामना करावा लागेल. शिवाय दानवे यांना अनपेक्षितरीत्या उमेदवारी मिळाल्यामुळे  शिवसेनेतील इतर इच्छुक आणि पक्षातील नेत्यांची मने दुखावली आहेत. त्याअंतर्गत राजकारणाचा परिणाम काय होणार, हे आताच सांगणे अवघड आहे. निवडणुकीत भाजपसह ६५७ मतदार सर्व मिळून आहेत. त्यामध्ये भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १७०, राष्ट्रवादी काँग्रेस ८०, एमआयएम २८, रिपाइं, बसपा व इतर पक्ष, अपक्ष मिळून ४९ असे मतदार आहेत. 

भाजप नगरसेवकांना आला ‘भाव’औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. १८९ च्या आसपास भाजपचे नगरसेवक मतदार आहेत. त्यामुळे भाजपचे नगरसेवकच किंगमेकर ठरणार आहेत. २०१३ साली झालेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक किंगमेकर ठरले होते. त्यावेळी युतीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजपच्या मतदारांना सध्या ‘भाव’ आला आहे. 

शिवसेनेला धास्ती मतं फुटीची; मतदारांसाठी ‘व्हीप’ बजावणार

अंदाजे पक्षीय बलाबल पक्ष    मतदार भाजप    १८९शिवसेना    १४१    काँग्रेस    १७०राष्ट्रवादी काँग्रेस    ०८०एमआयएम    ०२८रिपाइं, बसपा, अपक्ष    ०४९एकूण    ६५७

राजकीय समीकरणनिहाय मतदानमहायुती    ३३०महाआघाडी    २५०एमआयएम-अपक्ष    ०७७एकूण    ६५७ 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाVidhan Parishadविधान परिषद