शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

‘निकाह’ अत्यंत साधेपणाने करण्याचे हजरत मौलाना साद यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:12 IST

‘निकाह’अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने करावा, असे आवाहन रविवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये दिल्लीच्या मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांनी केले.

ठळक मुद्दे९१ लाख चौरस फुटांच्या मुख्य मंडपाबाहेरही लाखोंच्या संख्येने साथींनी गर्दी केली होती. असरच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक बारीकसारीक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंब करावी.

औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून मुस्लिम बांधव ‘निकाह’पद्धतीवर अनावश्यक पद्धतीने लाखो रुपये खर्च करीत आहेत. हे अल्लाह आणि प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांना अजिबात अपेक्षित नाही. ‘निकाह’अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने करावा, असे आवाहन रविवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये दिल्लीच्या मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांनी केले.

रविवारी सायंकाळी ठीक ५.३० वाजता ‘असर’ची नमाज इज्तेमास्थळी अदा करण्यात आली. ९१ लाख चौरस फुटांच्या मुख्य मंडपाबाहेरही लाखोंच्या संख्येने साथींनी गर्दी केली होती. जिथे जागा मिळेल तिथेच नमाज अदा करण्यात आली. रविवारी या परिसरात कुठेच पाय ठेवायला जागा नव्हती. असरच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक बारीकसारीक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंब करावी. यातच अल्लाह ‘राजी’होऊ शकतात. लग्नकार्य अत्यंत साधेपणाने साजरे करायला हवे. साथींनी दावतच्या कामात आपले अधिक योगदान दिले पाहिजे.

आयुष्यात यशस्वी होण्यामागे साधेपणा खूप आवश्यक आहे. आपल्या अपत्यांवर कसे संस्कार करणार हे अगोदरच ठरवून घ्या. एकोप्यातील गोष्टी चार जणांसमोर अजिबात सांगू नये, असेही साद साहब यांनी सांगितले. हजरत साद साहब यांचे मार्गदर्शन लाखो साथी बांधव अत्यंत शांतपणाने ऐकत होते. इज्तेमामध्ये दिल्लीहून आलेले हजरत मौलाना साद साहब यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी साथी बांधव आतुर झाले होते. मागील दोन दिवसांमध्ये त्यांनी तीनवेळेस मार्गदर्शन केले. उद्या त्यांच्या नेतृत्वाखालीच दुआ होणार आहे.

तीन हजारांच्या आसपास सामूहिक विवाहऔरंगाबाद शहरात यापूर्वी जिल्हानिहाय इज्तेमामध्ये शेकडोंच्या संख्येने सामूहिक विवाह लावण्यात आले आहेत. तीन हजारांच्या आसपास सामूहिक विवाह लागण्याची ही पहिलीच वेळ होती. लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने लग्न सोहळा होणे हे कधीतरी घडत असते. मुख्य मंडपाच्या परिसरात जिल्हानिहाय लग्न लावण्यात आले.

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८Aurangabadऔरंगाबाद