शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

मोबाईलने घेतलेला आणखी एक बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:44 AM

सोशल मीडियाचे वेड : संशयपिशाच्चाने उडवले पत्नीचे मस्तक!

श्यामकुमार पुरेसिल्लोड : ती सतत फोनवर बोलते, व्हॉटस् अ‍ॅप, यूट्यूब बघते, तिचा फोन नेहमी बिझी असतो, म्हणून तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील, अशा संशयाचे भूत डोक्यात घुसल्याने १४ आॅगस्ट रोजी पतीने चक्क पत्नीचे मुंडके छाटले होते. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून मी पत्नीवर खूप प्रेम करायचो, पण ती सतत फोनवर बोलायची, यामुळे तिचा खून केला. आता खून केल्याचा मला खूप पश्चाताप होतोय, असे आरोपीने पोलिस तपासात सांगितले.सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मागील आठवड्यात ही भयंकर घडली होती. खून करणारा आरोपी पती रवींद्र बनकर सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यासह मयत विवाहितेचा सासरा साहेबराव रामराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर यांना न्यायालयाने २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर सासू लंकाबाई साहेबराव बनकर, जाऊ शीतल अशोक बनकर या दोघांना हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले आहे. खून पतीने केला असला तरी तिला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करणारे, शारिरीक, मानसिक त्रास देणारे सासू, सासरे, दीर, जाऊ हे सर्वच पोलीस व न्यायालयीन कोठडीत आहेत.११ वर्षांपूर्वी झाले होते लग्नदेऊळगाव बाजार हे चारशे ते पाचशे उंबऱ्याचे गाव. येथील रहिवासी रवींद्र साहेबराव बनकर (३०) याचे ११ वर्षांपूर्वी मंगला हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांच्या संसारवेलीवर सागर (४) व भक्ती (६) ही दोन फुले उमलली. रवींद्र हा शेती व व्यापार करत असे. सर्व काही सुरळीत असताना त्यांच्या संसाराला संशयाच्या भुताने घेरले, अन् ही घटना घडली.वारंवार समजवूनही ती ऐकत नाही, यामुळे तिचे नक्की कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील. तिच्यात बदल होत नाही, ती मला फसवत आहे. समाजात मला तोंड दाखवायला जागा उरली नाही, अशा संशयातून त्याने टोकाचे पाऊल उचलले व रागाच्या भरात रात्री पत्नीचे मुंडके छाटले.पोलिसांचे कौशल्यघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, सहायक निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक संदीप सावळे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याच दिवशी खुनात वापरलेली धारदार कुºहाड पोलिसांनी जप्त केली व गुन्हा उघडकीस आणला. यापूर्वीही केळगाब येथे बापाने मुलाचा खून केल्याचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला होता.दोन्ही मुले अनाथपती-पत्नी हे सुखी संसाराच्या गाडीचे दोन चाके असतात. यातील एकही वाकले, त्याला तडा गेला तर काय होते. हे या घटनेवरून दिसून येते. मंगलाचा जीव गेला तर सागर आणि भक्ती हे सर्व काही असताना मातृवात्सल्यापासून अनाथ झाले आहेत.