शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

जनावरांचे इअर टॅगिंग असेल तरच मिळणार आरोग्य सुविधा, करता येणार खरेदी-विक्री

By विजय सरवदे | Updated: May 30, 2024 19:26 IST

३१ मेपूर्वी आपल्या जनावरांना इअर टॅगिंग करून घेण्याचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर : इअर टॅगिंग नसेल, तर १ जूनपासून पशुधनाच्या खरेदी-विक्रीला बंदी घातली जाणार आहे. १२ अंकी असलेली ही इअर टॅगिंग म्हणजे जनावरांचे आधार कार्डच आहे. विशेष म्हणजे, हा टॅगिंग क्रमांक मालकाच्या आधार कार्डसोबत लिंक असणार आहे. त्यामुळे जनावरांचे टॅगिंग केले नसेल, तर पशुपालकांनी ते ३१ मेपूर्वीच करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

आरोग्य सुविधांपासून कोणतेही पशुधन वंचित राहू नये, यासाठी आधार कार्डच्या धरतीवर पशुधनासाठी ईअर टॅगिंग सक्तीचे करण्यात आले आहे. १ जूननंतर इअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून वैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक साहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसानभरपाईची रक्कम देय होणार नाही.

- सर्व पशूंना इअर टॅगिंग आवश्यक

इअर टॅगिंगच्या माध्यमातून सर्व पशुधनाच्या नोंदी ठेववल्या जाणार आहेत. यात जन्म-मृत्यूची नोंद, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधी, मालकी हक्क हस्तांतरण यासह अन्य नोंदी असणार आहेत.

- पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक

सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी. जेणेकरून पशुधनांमधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमन २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशू व पशुधन उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व पशुधनाचे इअर टॅग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- पशुधन खरेदी-विक्रीलाही प्रतिबंध

इअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- एक जूनपासून अंमलबजावणी

एक जूनपासून सर्व पशुधनासाठी टॅगिंगशिवाय खरेदी-विक्रीला बंदी, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही.

शासनाने इअर टॅगिंग सक्तीचे केले असून, त्यामुळे जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण या बाबी कळून येतात. एवढेच नाही, तर पशुधनाचे प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, आदी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी ३१ मेपर्यंत आपल्या जनावरांना इअर टॅगिंग करावे.

- डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र