शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

जनावरांचे इअर टॅगिंग असेल तरच मिळणार आरोग्य सुविधा, करता येणार खरेदी-विक्री

By विजय सरवदे | Updated: May 30, 2024 19:26 IST

३१ मेपूर्वी आपल्या जनावरांना इअर टॅगिंग करून घेण्याचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर : इअर टॅगिंग नसेल, तर १ जूनपासून पशुधनाच्या खरेदी-विक्रीला बंदी घातली जाणार आहे. १२ अंकी असलेली ही इअर टॅगिंग म्हणजे जनावरांचे आधार कार्डच आहे. विशेष म्हणजे, हा टॅगिंग क्रमांक मालकाच्या आधार कार्डसोबत लिंक असणार आहे. त्यामुळे जनावरांचे टॅगिंग केले नसेल, तर पशुपालकांनी ते ३१ मेपूर्वीच करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

आरोग्य सुविधांपासून कोणतेही पशुधन वंचित राहू नये, यासाठी आधार कार्डच्या धरतीवर पशुधनासाठी ईअर टॅगिंग सक्तीचे करण्यात आले आहे. १ जूननंतर इअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून वैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक साहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसानभरपाईची रक्कम देय होणार नाही.

- सर्व पशूंना इअर टॅगिंग आवश्यक

इअर टॅगिंगच्या माध्यमातून सर्व पशुधनाच्या नोंदी ठेववल्या जाणार आहेत. यात जन्म-मृत्यूची नोंद, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधी, मालकी हक्क हस्तांतरण यासह अन्य नोंदी असणार आहेत.

- पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक

सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी. जेणेकरून पशुधनांमधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमन २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशू व पशुधन उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व पशुधनाचे इअर टॅग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- पशुधन खरेदी-विक्रीलाही प्रतिबंध

इअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- एक जूनपासून अंमलबजावणी

एक जूनपासून सर्व पशुधनासाठी टॅगिंगशिवाय खरेदी-विक्रीला बंदी, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही.

शासनाने इअर टॅगिंग सक्तीचे केले असून, त्यामुळे जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण या बाबी कळून येतात. एवढेच नाही, तर पशुधनाचे प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, आदी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी ३१ मेपर्यंत आपल्या जनावरांना इअर टॅगिंग करावे.

- डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र