शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

विटावात संतप्त महिलांनी पाईपलाईन फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 20:20 IST

वाळूज महानगरातील विटावा गावचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महिनाभरापासून पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी शनिवारी गावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून टाकत आपला राग व्यक्त केला.

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील विटावा गावचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महिनाभरापासून पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी शनिवारी गावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून टाकत आपला राग व्यक्त केला.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखणाऱ्या जाणाºया घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया विटावा गावातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. समर्थनगरमध्ये भीषण पाणीटंचाईमुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. गावचा पाणीप्रश्न सोडविण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली. याची दखल घेत ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत १ कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करुन पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले.

मात्र, दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाईपलाईन टाकून गावला पाणीपुरवठा केला जातो. मात्र या पाईपलाईनवर अनेकांनी अवैध नळ जोडणी घेतली आहे. या प्रकारामुळे बहुतांश भागातील रहिवाशांना पाणी मिळत नाही.

महिनाभरापासून पाणी येत नसल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी शनिवारी एमआयडीसीच्या जलवाहिनीतून गावला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत पाईपलाईन फोडली. तोडलेले पाईप उपसरपंच रामकिसन म्हस्के यांच्या घरासमोर आणून टाकत पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केली. महिलांचे रौद्ररुप पाहून उपसरपंच म्हस्के यांनी पीव्हीसी पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याचे आश्वास दिले. यावेळी सुनिल कानडे, सोपान सातपुते, अंकुश देवबोन, कैलास शिनगारे, राजू गव्हाणे, अरुण गव्हाणे, विलास पिठले, राहुल पोटफाडे, संतोष पोटे, अजय तागड आदींसह महिला - पुरुष उपस्थित होते.

तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा बंदएमआयडीसीने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यात कपात केली असून, शुक्रवारी एमआयडीसीचे पाणी आले नाही. तसेच गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शनिवारी सकाळी फुटली. या तांत्रिक अडचणीमुळे विटावा गावाला सुरळीत पाणीपुरवठा करता आला नाही. नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून ग्रामपंचायतीने दोन खाजगी टँकरने पाणीपुरवठा केला, असे ग्रामविकास अधिकारी बी.बी. गव्हाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई