शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग; वडील, भावाने चाकूने भोसकून जावयाचा केला खून

By सुमित डोळे | Updated: July 26, 2024 13:16 IST

प्रेमविवाहानंतर सारे शांत झाल्याचे वाटले; तीन महिन्यानंतर अचानक सासरे, मेव्हण्याने हल्ला करून तरुणाला संपवले

छत्रपती संभाजीनगर : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला होता. इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके (२५) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. पोट व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी अमितचा घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे लहानपणीची मैत्रिण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, भिन्न धर्मामुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारल्याने २ मे रोजी ते घरी परतले. त्यानंतर त्यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. मात्र, विद्याच्या कुटुंबाच्या मनातला राग गेला नव्हता. विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. १४ जुलै रोजी अमित परिसरात फिरत असताना गीताराम व आप्पासाहेबने त्याच्यावर चाकूने गंभीर वार केले. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी अमितची मृत्यूशी झुंज अखेर संपली.

संतप्त पत्नीचा पोलिस ठाण्यात ठिय्याअमितवरील हल्ल्याला ११ दिवस उलटूनही मारेकरी वडील व भावाला जवाहरनगर पोलिसांनी अटक न केल्याने अमितच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत त्याच्या कुटुंबीयांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात ठाण मांडून होते. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. शिवाय, सासरा गीताराम व आप्पासाहेबव्यतिरीक्त पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद