शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या वसतिगृह शुल्कवाढी विरोधात संताप; विद्यार्थी, प्राध्यापक, अधिसभा सदस्य आक्रमक

By राम शिनगारे | Updated: April 15, 2024 12:00 IST

विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क २ हजार ६५ रुपयांवरून थेट ३ हजार २०० रुपये करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऐन दुष्काळात ५० टक्क्यांहून अधिक शुल्क वाढविण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. प्राध्यापक संघटना, अधिसभा सदस्य आणि विद्यार्थी संघटनांनी शुल्कवाढीचा निषेध नोंदवित तीव्र संताप व्यक्त केला आहे. या शुल्क वाढीच्या विरोधात व्यापक आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.

विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क २ हजार ६५ रुपयांवरून थेट ३ हजार २०० रुपये करण्यात आली आहे. त्याशिवाय इतरही चार्जेस वाढविण्यात आले. या निर्णयाचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. एसएफआय, पॅंथर्स रिपब्लिक विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीसह इतर संघटनांनी या शुल्कवाढीचा निषेध नोंदविला आहे. त्याशिवाय वाढविण्यात आलेले शुल्क हाणून पाडण्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्णयही विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे. विद्यार्थी संघटनांच्या लढ्याला स्वाभिमानी मुप्टा, बामुक्टोसह इतर प्राध्यापक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच अधिसभा सदस्यांनी या शुल्कवाढीचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

मागच्या दुष्काळात मोफत जेवण दिलेऐन दुष्काळात वसतिगृहांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असताना आम्ही निधी उभारून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना चार महिने मोफत जेवण देऊन स्थलांतर थांबविले. आताचे प्रशासन नफेखोरीसाठी शुल्कवाढ करीत आहे. त्याचा जाहीर निषेध करीत शुल्कवाढ मागे घ्यावी.- डॉ. नरेंद्र काळे,अधिसभा सदस्य

हा तर तुघलकी निर्णयवंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाहू, फुले, आंबेडकर यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात ऐन दुष्काळात शुल्कवाढ केली जात आहे. हा प्रकार अतिशय निषेधार्ह असून, असा तुघलकी निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास राज्यपालकांकडे दाद मागण्यात येईल.-प्रा. हरिदास (बंडू) सोमवंशी, अधिसभा सदस्य

विद्यापीठ बंद पाडण्याचा डावविद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थी येतात. याठिकाणी अल्पदरात शिक्षण मिळण्याची त्यांना हमी होती. मात्र, आता शिक्षण महाग करून ग्रामीण भागातील विद्यार्थीच येऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्यातून विद्यापीठ बंद पाडण्याचाच डाव असल्याचे दिसून येत आहे. या विरोधात सर्वजण एकत्र येत संघटित लढा उभारणार आहोत.- डॉ. उमाकांत राठोड,अधिसभा सदस्य

अन्याय सहन केला जाणार नाहीविद्यापीठात बहुजन विद्यार्थ्यांचा वाली कोणीही राहिला नाही. प्रशासन चुकीच्या नियुक्त्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते. त्यावर कोणीही काही बोलत नाही. त्यात विद्यार्थ्यांचे दुष्काळात शुल्क वाढविले जाते. विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय सहन केला जाणार नाही. याविरोधात लढा उभारला जाईल.- प्राचार्य शंकर अंभोरे, अधिसभा सदस्य

वसतिगृहांचा कायापालट करण्याचा संकल्पविद्यापीठातील वसतिगृहाचे शुल्क कमी ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. त्याचबरोबर वसतिगृहांचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. शुल्क वाढविले असले तरी त्या तुलनेत सुविधा अधिक प्रमाणात वाढणार आहे. मागील अनेक वर्षांपासून शुल्क वाढविण्यात आलेले नव्हते म्हणून यावेळी मान्यता दिली आहे.-डॉ. योगिता होके पाटील,व्यवस्थापन परिषद सदस्य

कमीत कमी वाढीचा प्रयत्नविद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी विविध २१ निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. जी काही शुल्क वाढ करण्यात आली, त्यातही कमीत कमी वाढीचा आग्रह धरला होता. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सर्वांत कमी शुल्क आपल्याकडचे आहे.- ॲड. दत्ता भांगे, व्यवस्थापन परिषद सदस्य.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद