शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

अन् ती भेट अखेरची ठरली

By admin | Updated: June 4, 2014 01:36 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद ‘मी आजपासूनच विधानसभेच्या प्रचारास सुरुवात केली आहे, तुम्हीही तयार व्हा,’ असा आदेश गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद शहरातील कार्यकर्त्यांना तीन दिवसांपूर्वी दिला होता.

 शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद ‘मी आजपासूनच विधानसभेच्या प्रचारास सुरुवात केली आहे, तुम्हीही तयार व्हा,’ असा आदेश गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद शहरातील कार्यकर्त्यांना तीन दिवसांपूर्वी दिला होता. हा आदेश व शहराची त्यांची ती भेटही अखेरचीच ठरली. केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गोपीनाथ मुंडे दि.३१ मे रोजी पहिल्यांदाच शहरात आले होते. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त चौंडी येथे होणारा कार्यक्रम व त्यानंतर भगवानगडाला भेट देण्यासाठी ते जाणार होते. मूळ कार्यक्रमानुसार ते विमानतळावरूनच हेलिकॉप्टरने चौंडीला जाणार होते; परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले. प्रसन्नता व विलसत्या हास्याने त्यांचा चेहरा अधिकच खुलला होता. मुंडेसाहेब हे हजरजबाबी व चांगले पट्टीचे वक्ते. आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात त्यांनी उपस्थितांना हसविले, काहींना चिमटे काढले व सर्वांना विधानसभा लढविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. तुम्ही तयार व्हा किंवा होऊ नका. मी मात्र आजपासूनच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास लागलो आहे, असे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांच्या बोलण्यात मोठा आत्मविश्वास होता. ग्रामविकासाच्या अनेक कल्पना स्पष्ट करून रोजगार हमी योजनेतील अडचणी सोडविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला होता. साहेब, आम्हाला व्याजासह परत द्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणात म्हणाले होते की, मुंडेसाहेब आपल्या हातून देशाची चांगली सेवा घडो. त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दानवेसाहेब मुंडेसाहेब आम्ही केंद्राला फक्त तीन महिन्यांसाठी उसने दिलेत. तीन महिन्यांनंतर आम्हाला आमचे साहेब व्याजासह परत द्या. त्यांच्या हातून राज्याची सेवा घडणार आहे. राज्याची सेवासुद्धा देशसेवाच आहे. त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता; परंतु काळाने मंगळवारी त्यांच्यावर झडप घालून त्यांना आपल्यातून हिरावून नेले, अशी व्यथा कार्यकर्ते मांडत होते. ४मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादशी गोपीनाथ मुंडे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. औरंगाबादचा त्यांचा पहिला संबंध आला, तो आणीबाणीनंतर १९७५ मध्ये. पुण्यात विधि शाखेत शिकत असताना गोपीनाथ मुंडे यांनी तळेगाव मावळ येथे झालेल्या जनसंघाच्या अधिवेशनात प्रमोद महाजन यांच्यामुळे उपस्थिती लावली. तेथे त्यांची भेट वसंतराव भागवतांशी झाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आणीबाणीला विरोध करण्यासाठी मुंडे, महाजन औरंगाबादेत आले. ‘मराठवाडा’च्या शेजारील सन्मित्र कॉलनीत एक खोली भाड्याने घेऊन ते, प्रमोद महाजन व जयसिंगराव गायकवाड यांच्यासोबत राहू लागले. दिवसभर सायकलवर फिरून माहिती जमा करायची व रात्री त्या माहितीचे सायक्लोस्टाईल पत्रके तयार करून मोठमोठ्या अधिकार्‍यांच्या घरासमोर ती पत्रके ते गुपचूप टाकत. पोलिसांनी त्यांना अटक केली व हर्सूल जेलमध्ये टाकले.