शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

...अन् मध्यरात्री केला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:43 IST

मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा लढा दीर्घकाळापासून सुरू होता. राज्य मंत्रिमंडळाने १४ जानेवारी १९९४ रोजीच्या बैठकीत नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होऊ न देण्याचा इशारा शहरातील एका गटाने दिला होता. यामुळे मनपाच्या सहकार्याने मध्यरात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच प्रवेशद्वारावरील नामविस्ताराची मोहीम फत्ते केल्याची आठवण तत्कालीन कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली.

ठळक मुद्देविद्यापीठ नामविस्ताराचे रौप्यमहोत्सवी वर्षात उद्या पदार्पण तत्कालीन कुलगुरू विठ्ठलराव घुगे यांच्याशी संवाद

- राम शिनगारे औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा लढा दीर्घकाळापासून सुरू होता. राज्य मंत्रिमंडळाने १४ जानेवारी १९९४ रोजीच्या बैठकीत नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होऊ न देण्याचा इशारा शहरातील एका गटाने दिला होता. यामुळे मनपाच्या सहकार्याने मध्यरात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच प्रवेशद्वारावरील नामविस्ताराची मोहीम फत्ते केल्याची आठवण तत्कालीन कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ऐतिहासिक लढा जोमात होता. विधिमंडळाने नामांतराचा ठराव मंजूर केलेला असतानाही त्या ठरावाची अंमलबजावणी होत नव्हती. मात्र, डिसेंबर १९९३ मध्ये तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक सत्यपाल सिंग (विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री) हे भेटीला आले. त्यांनी नामांतर झाल्यास विद्यापीठ आणि महाविद्यालयातील स्थिती कशी राहील, याविषयी माहिती विचारली. तेव्हा महाविद्यालये विद्यापीठ नामांतराचे स्वागतच करतील. तरीही काही परिस्थिती उद्भवल्यास आम्ही सक्षम असल्याचे सत्यपाल सिंग यांना स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत होते. नवीन वर्ष उजाडले तेव्हा नामांतराच्या हालचाली वाढल्या. उच्चशिक्षण सचिव सतत संपर्कात होते. १४ जानेवारी १९९४ रोजी सकाळी ९ वाजताच फोन खणखणला. समोरून उच्चशिक्षण सचिव लखनपाल बोलत होते. त्यांनी सांगितले की, विद्यापीठ नामविस्तार ठराव मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. तुम्हाला सायंकाळपर्यंत शासन निर्णयाची प्रत मिळेल. ही प्रत मिळताच तात्काळ अंमलबजावणी करा, अशा सूचना मिळाल्यानंतर फोन कट झाला.

यानंतर तात्काळ अधिका-यांची बैठक बोलावली. सगळ्यांना संभाव्य परिस्थितीची कल्पना देत तयार राहण्याच्या सूचना दिल्या. तेथून नामविस्ताराचे समर्थक खासदार बापूसाहेब काळदाते यांना सायंकाळी विद्यापीठात नामविस्तार साजरा करण्याचे आमंत्रण दिले. संध्याकाळपर्यंत शासन निर्णय मिळाला. तेव्हाच खा. काळदाते यांच्या उपस्थितीत दणक्यात उत्सव साजरा केला. मात्र, शहरातून अशी माहिती कळाली की, विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर नामविस्तार होऊ न देण्यासाठी एक गट प्रयत्न करणार आहे. तेव्हाच निर्णय घेतला की, हे काम रातोरात करायचे. यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. गोविंद घारे यांची मदत घेतली. शहर पोलीस आयुक्तांनी पुरेसे संरक्षण दिले होते. १४ जानेवारी १९९४ च्या रात्री ११ वाजता विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ हे नाव टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा माझ्यासह विद्यापीठातील काही अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. हे काम पहाटे ४ वाजेपर्यंत चालले. प्रवेशद्वारावर नामविस्तार झाल्यानंतरच त्या ठिकाणाहून झोपण्यासाठी घरी गेलो. रातोरात नामविस्ताराची मोहीम फत्ते केली. नामविस्ताराचे विरोधक सकाळी नामविस्तार करू न देण्यासाठी जमले. मात्र, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत सायंकाळीच नामविस्तार झालेला असल्याचे दिसून आले. नामविस्तार ही घटना माझ्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची आणि आनंदाची आहे.

देश-विदेशातून संदेशनामविस्तार झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे संदेश देश-विदेशातून मिळाले. यात ब्रिटनचे तत्कालीन उच्चायुक्त एल. एम. सिंघवी यांनी विशेष अभिनंदन केले. यातच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला विद्यापीठात येण्याचे आश्वासन दिले. यानुसार १४ एप्रिल रोजी सिंघवी यांनी विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. याशिवाय अमेरिका, युरोपच्या अनेक देशांतून संदेश आले. देशभरातून तर संदेशाचा ओघ सुरूच होता.दोन दिवसांत स्टेशनरी बदललीविद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर त्याच दिवशी मध्यरात्री नामविस्तार करण्यात आला होता. मात्र, खरे आव्हान हे विद्यापीठाच्या सर्व प्रकारच्या स्टेशनरीवर नामविस्तार करण्याचे होते. पहिल्याच दिवशी सर्व जुनी स्टेशनरी रद्द केली. नवीन स्टेशनरी दोन दिवसांत तयार केली. यासाठी सर्वच जण रात्रंदिवस काम करीत होते. विद्यापीठाच्या प्रिंटिंग प्रेसमधील मशिनरी बदलण्यात आल्या. नामविस्ताराच्या नावासह सर्व प्रकारचे अर्ज, फॉर्म तयार करू घेतले.ख-या अर्थाने मेकओव्हरनामविस्तारानंतरच राज्य सरकारने विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. मुख्यमंत्री शरद पवार यांनी विविध योजना तयार करून प्रस्ताव देण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार २२ कोटी रुपयांचा कृती आराखडा राज्य सरकारकडे पाठवला. पहिल्या टप्प्यात साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात केमिकल टेक्नॉलॉजी, पर्यावरण, पर्यटन, संगणकशास्त्र विभाग सुरू केले. विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ जागांना मंजुरी मिळाली. परीक्षा भवनाच्या इमारतीला मुहूर्त सापडला. नामविस्तारामुळे विद्यापीठ ख-या अर्थाने मेकओव्हर झाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद