शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

८० वर्षांच्या कर्कग्रस्ताला बोलाविले आरटीओत, ऑक्सिजन नळीसह पूर्ण केली प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 15:04 IST

ऑक्सिजन नळीसह पूर्ण केली प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क  औरंगाबाद : वाहनाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी ८० वर्षांच्या कॅन्सरग्रस्ताला आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. या रुग्णाला नाकातून टाकलेल्या नळीतून (राइल्स ट्यूब) अन्न, पाणी दिले जात आहे. अशा अवस्थेतील या ज्येष्ठाला पाहून अनेकांनी चिंता व्यक्त करीत कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या कॅन्सरग्रस्ताला अन्न आणि पाणी हे नळीच्या माध्यमातूनच दिले जात आहे. असे असताना वाहनाच्या हस्तांतरासाठी असलेल्या ‘बीफोर मी’ या प्रक्रियेसाठी त्यांना आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आले.  कार्यालयातही खिडकीसमोर या ज्येष्ठाला तासभर ताटकळत ठेवण्यात आल्याचे अरुण माडूकर यांनी सांगितले. यासंदर्भातील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली.

आरटीओ अधिकारी म्हणाले, याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार म्हणाले, कार्यालयाने संबंधिताला बोलावलेले नव्हते. कॅन्सरग्रस्ताला आरटीओत घेऊन येणाराच या प्रकारासाठी जबाबदार आहे. त्याविषयी कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. वाहन विक्रीत गैरप्रकार होण्याची शक्यता असते. बनावट सह्या करून वाहने विकण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘बीफोर मी’ ही प्रक्रिया राबविली जाते. कोणाची अडचण असेल तर त्यासंदर्भात योग्य ती मदत केली जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस