शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
4
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
5
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
6
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
7
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
8
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
9
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
10
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
11
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
14
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
15
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
16
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
17
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
18
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
19
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर

टंचाईवर विंधन विहिरींची मात्रा

By admin | Updated: May 21, 2014 00:14 IST

आशपाक पठाण , लातूर लातूर शहराला गेल्या चार महिन्यांपासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत.

 आशपाक पठाण , लातूर लातूर शहराला गेल्या चार महिन्यांपासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. नळाला महिन्यातून तीनवेळा पाणी येत आहे. तेही अपुरेच मिळत असल्याने पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. खाजगी विंधन विहिरींना पाणी असले तरी त्या पाण्याची विक्री टंचाईमुळे जोरात सुरू आहे. काही भागांत १ रुपया, तर काही भागांत २ रुपयांना घागरभर पाणी विकले जात आहे. टंचाईवर उपाययोजना म्हणून मनपा प्रशासनाने विंधन विहिरी खोदण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढल्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मनपा कार्यक्षेत्रातील ३५ प्रभागांत आवश्यकतेनुसार विंधन विहिरी खोदण्यासाठी ई-टेंडरिंगद्वारे निविदा मागविण्यात आल्या आहेत. विंधन विहीर खोदणे, केसिंग पाईप बसविणे, पाणी चाचणी करणे व कॅप बसविणे यासाठी केवळ दोन निविदा प्रारंभी आल्या होत्या. मात्र हातपंप बसविणे व कट्टा टाकी बसविणे यासाठी एकही निविदा आलेली नव्हती. त्यामुळे मनपा प्रशासनाने २० मे रोजी फेरनिविदा काढली आहे. तातडीची पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेला हा उपक्रम पूर्णत्वास कधी जाणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. सध्या पाणीटंचाईमुळे भटकंती करणार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे पाणी विक्रीच्या व्यवसायाला लातुरात सध्या चांगले दिवस आले आहेत. खाजगी पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांची संख्या वाढली आहे. ३०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत टँकर विक्री होत आहे. ५०० लिटर्सपासून ते ५००० लिटर्सच्या टँकरमधून पाणी विक्री केली जात आहे. एमजीपीकडे लातूर शहराचा पाणीपुरवठा असला, तरी मांजरा प्रकल्प व साई बॅरेजेसमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईचे चटके वाढले आहेत. मनपाने नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीची उपाययोजना हाती घेतली आहे. त्यानुसारच हातपंप, विंधन विहिरींची दुरुस्ती तात्काळ केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तातडीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेने विंधन विहीर खोदणे, हातपंप बसविणे, कट्टा टाकी बांंधणे व बसविणे यासाठी दहा दिवसांपूर्वी निविदा काढली होती. १९ मेपर्यंत ई-टेंडरिंगद्वारे कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने नव्याने २० मे रोजी फेरनिविदा काढण्यात आली आहे. कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने फेरनिविदा काढण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होणार कधी? नागरिकांना पाणी मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा शिल्लक असून, जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते. पावसाळा सुरू झाल्यावर मनपाचे तातडीचे पाणी मिळणार काय? अशी चर्चा नागरिकांतून सुरू आहे. मनपा कार्यक्षेत्रात असलेल्या बहुतांश विंधन विहिरींना पाणी सुरू आहे. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच पाईपलाईनचे कामही करण्यात येत आहे. सध्या असलेल्या विंधन विहिरी बंद पडल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून नवीन प्रभागनिहाय ३५ विंधन विहिरींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच निविदा मागविण्यात आल्या आहेत. सध्या असलेली योजना बंद पडल्यावर ही उपाययोजना असल्याने विलंब वगैरे काही नसल्याचे महापौर स्मिता खानापुरे यांनी सांगितले.