शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

तीन वर्षांच्या दुष्काळानंतर वेळा अमावस्या जोरात !

By admin | Updated: December 27, 2016 23:58 IST

लातूर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे़

आशपाक पठाण  लातूरकधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे़ जिल्ह्यात वेळा अमावस्या उत्सव दरवर्षी शेतकरी सण म्हणूनच साजरा करतात़ आप्तस्वकियांसाठी उठणाऱ्या जेवणाच्या पंगती मागील तीन वर्षातील दुष्काळामुळे कमी झाल्या होत्या़ यावर्षी भरपूर पाऊस झाला़ त्यामुळे शेत-शिवाराने हिरवा शालू पांघरला आहे़ पिके जोमात असल्याने यंदाच्या वेळामवस्येत शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत दुष्काळाच्या झळा तीव्र होत्या़ विंधन विहिरी, नद्या, नाले कोरडेठाक पडले होते़ परिणामी, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता़ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पाणीही घरातूनच घेऊन जावे लागले होते़ शेतात पेरले ते उगवलेही नाही़ तीन वर्षांपासून शेती तोट्यात होती़ निसर्गाच्या कृपेने यावर्षी जोरदार पाऊस झाला़ खरिपाची पिके जोमात आली़ काढणीच्या वेळी नद्या, नाल्यांना आलेल्या पुरात अनेक ठिकाणची पिके वाहून गेली यातही शेतकरी खचले नाही़ कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ कधीही परवडला म्हणत शेतकरी यातून सावरले़ रबी पिकांची पेरणी वेळेत झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी, करडई आदी पिकांनी शिवारं फुलली आहेत़ खरिपाची तूर बहरली असून शेंगा जास्त लागल्याने काही ठिकाणी फांद्या जमिनीला लोळत आहेत़ शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने ऊस लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे़ जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, शेतीसाठी मुबलक पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदात आहे़ विजेचा लपंडाव असला तरी महावितरणच्या नियोजनानुसार शेतकरी पिकांना पाणी देत आहेत़ पिके जोमात असल्याने शेतकरी मोठ्या आनंदात आहे़