शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

तीन वर्षांच्या दुष्काळानंतर वेळा अमावस्या जोरात !

By admin | Updated: December 27, 2016 23:58 IST

लातूर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे़

आशपाक पठाण  लातूरकधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे़ जिल्ह्यात वेळा अमावस्या उत्सव दरवर्षी शेतकरी सण म्हणूनच साजरा करतात़ आप्तस्वकियांसाठी उठणाऱ्या जेवणाच्या पंगती मागील तीन वर्षातील दुष्काळामुळे कमी झाल्या होत्या़ यावर्षी भरपूर पाऊस झाला़ त्यामुळे शेत-शिवाराने हिरवा शालू पांघरला आहे़ पिके जोमात असल्याने यंदाच्या वेळामवस्येत शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत दुष्काळाच्या झळा तीव्र होत्या़ विंधन विहिरी, नद्या, नाले कोरडेठाक पडले होते़ परिणामी, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता़ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पाणीही घरातूनच घेऊन जावे लागले होते़ शेतात पेरले ते उगवलेही नाही़ तीन वर्षांपासून शेती तोट्यात होती़ निसर्गाच्या कृपेने यावर्षी जोरदार पाऊस झाला़ खरिपाची पिके जोमात आली़ काढणीच्या वेळी नद्या, नाल्यांना आलेल्या पुरात अनेक ठिकाणची पिके वाहून गेली यातही शेतकरी खचले नाही़ कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ कधीही परवडला म्हणत शेतकरी यातून सावरले़ रबी पिकांची पेरणी वेळेत झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी, करडई आदी पिकांनी शिवारं फुलली आहेत़ खरिपाची तूर बहरली असून शेंगा जास्त लागल्याने काही ठिकाणी फांद्या जमिनीला लोळत आहेत़ शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने ऊस लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे़ जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, शेतीसाठी मुबलक पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदात आहे़ विजेचा लपंडाव असला तरी महावितरणच्या नियोजनानुसार शेतकरी पिकांना पाणी देत आहेत़ पिके जोमात असल्याने शेतकरी मोठ्या आनंदात आहे़