शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांच्या दुष्काळानंतर वेळा अमावस्या जोरात !

By admin | Updated: December 27, 2016 23:58 IST

लातूर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे़

आशपाक पठाण  लातूरकधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे़ जिल्ह्यात वेळा अमावस्या उत्सव दरवर्षी शेतकरी सण म्हणूनच साजरा करतात़ आप्तस्वकियांसाठी उठणाऱ्या जेवणाच्या पंगती मागील तीन वर्षातील दुष्काळामुळे कमी झाल्या होत्या़ यावर्षी भरपूर पाऊस झाला़ त्यामुळे शेत-शिवाराने हिरवा शालू पांघरला आहे़ पिके जोमात असल्याने यंदाच्या वेळामवस्येत शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत दुष्काळाच्या झळा तीव्र होत्या़ विंधन विहिरी, नद्या, नाले कोरडेठाक पडले होते़ परिणामी, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता़ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पाणीही घरातूनच घेऊन जावे लागले होते़ शेतात पेरले ते उगवलेही नाही़ तीन वर्षांपासून शेती तोट्यात होती़ निसर्गाच्या कृपेने यावर्षी जोरदार पाऊस झाला़ खरिपाची पिके जोमात आली़ काढणीच्या वेळी नद्या, नाल्यांना आलेल्या पुरात अनेक ठिकाणची पिके वाहून गेली यातही शेतकरी खचले नाही़ कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ कधीही परवडला म्हणत शेतकरी यातून सावरले़ रबी पिकांची पेरणी वेळेत झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी, करडई आदी पिकांनी शिवारं फुलली आहेत़ खरिपाची तूर बहरली असून शेंगा जास्त लागल्याने काही ठिकाणी फांद्या जमिनीला लोळत आहेत़ शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने ऊस लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे़ जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, शेतीसाठी मुबलक पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदात आहे़ विजेचा लपंडाव असला तरी महावितरणच्या नियोजनानुसार शेतकरी पिकांना पाणी देत आहेत़ पिके जोमात असल्याने शेतकरी मोठ्या आनंदात आहे़