शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

सर्वांगीण विकास आवश्यक - राहुल पुंगालिया

By admin | Updated: December 18, 2015 23:49 IST

औरंगाबाद : ‘साहित्य हे स्वायत्त असावे, कारण साहित्यामुळे विकासासाठी मानसिक तयारी होते, त्यामुळे सर्वांगीण विकास असेल तरच सकारात्मक बदल घडवता येतो’,

औरंगाबाद : ‘साहित्य हे स्वायत्त असावे, कारण साहित्यामुळे विकासासाठी मानसिक तयारी होते, त्यामुळे सर्वांगीण विकास असेल तरच सकारात्मक बदल घडवता येतो’, असे मत विचारवंत डॉ. राहुल पुंगालिया यांनी ‘कल्चर, आयडियॉलॉजी अ‍ॅण्ड लिटरेचर’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. मौलाना आझाद महाविद्यालय व डॉ. रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फातिमा रफिक झकेरिया होत्या. त्या म्हणाल्या, ‘शिक्षण आणि सत्ता या दोन गोष्टींमुळे संस्कृती जन्माला येत असते. म्हणूनच अशा विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे.’ व्यासपीठावर डॉ. ए. जी. खान, डॉ. मकदुम फारुकी, प्राचार्य सतीश जयराम, सलीम बिस्मिल्लाह खान, डॉ. फरहाना खान, डॉ. हसीब खान आदींची उपस्थिती होती. डॉ. ए. जी. खान यांनी विचार व संस्कृतीद्वारे ऐक्य साधण्याचे आवाहन केले. डॉ. रफि उद्दीन नासेर यांनी ‘वायू प्रदूषण’ या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. येमेन येथील विद्यार्थ्यांनी फातिमा झकेरिया यांचा मानचिन्ह देऊन सत्कार केला. डॉ. फरहाना खान यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. हसीब खान यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एहतेशाम काद्री यांनी करून दिला. प्रा. राजन शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डॉ. हमीद खान, मुक्रिम खान, डॉ. रब्बानी, डॉ. रझाउल्लाह खान, डॉ. झाहेद झहीर, डॉ. शाहेद जी. शेख, प्रा. झकीउद्दीन सिद््दीकी, डॉ. निलोफर शाकेर, डॉ. मेहेरुन्निसा पठाण, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. परवेझ अस्लम, डॉ. शेख कलीम, अब्दुल्लाह जिलानी, झरीना देशमुख, खालेद अहेमद आदींची प्रमुख उपस्थिती होती.