शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व खत आणि बियाणे विक्री दुकानांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 20:03 IST

कृषिमंत्री भुसे यांनी रविवारी जाधववाडीतील नवभारत फर्टिलायझर्सवर छापा मारून खतांच्या साठेबाजीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जिल्हा कृषी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

ठळक मुद्देतक्रारीनंतर निर्णय का नाही जिल्हा कृषी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात

- विकास राऊत

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी खत मिळत नसल्याबाबत तक्रार करूनही यंत्रणेने लक्ष न दिल्यामुळे स्वत: कृषिमंत्री दादा भुसे यांना छापा टाकावा लागल्याने राज्य कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी जिल्ह्यासह राज्यातील सर्व रासायनिक खते, बियाणे विक्रीच्या दुकानांतील साठा आणि वस्तुस्थिती तपासण्याची विशेष मोहीम कृषी विभागाने राबविण्याचे आदेश सोमवारी जारी केले आहेत. 

कृषिमंत्री भुसे यांनी रविवारी जाधववाडीतील नवभारत फर्टिलायझर्सवर छापा मारून खतांच्या साठेबाजीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जिल्हा कृषी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. त्या खत विक्रीच्या दुकानात स्टॉक रजिस्टर, ई-पॉस मशीन कृषिमंत्र्यांनी छापा मारल्यावर निदर्शनास आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे असाच प्रकार सुरू आहे की, काय अशी शंका उपस्थित होत आहे. 

दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कृषी अधिकारी मोटे, गंजेवार यांना बोलावून घेतले होते. खतांच्या साठेबाजीचे प्रकरण नेमके काय आहे, हे जाणून घेतले. जे काही घडले त्याबाबत कृषी आयुक्तालय याबाबत चौकशी करील; परंतु जिल्ह्यात कुठेही जास्तीच्या दराने खत विक्री होणार नाही, लिकिंग होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यात पुन्हा आढावा घेण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीदेखील याप्रकरणी आढावा घेतला आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात सहा ते सात मोठे खतांचे वितरक आहेत. त्यांच्याकडून खतांचे वितरण कसे झाले आहे, याबाबतची माहिती विशेष मोहिमेत समोर येणे शक्य आहे. यंत्रणेवर वचक  म्हणून उलटतपासणी झालीच पाहिजे; परंतु यंत्रणेचे मनोबल खच्ची करू नये, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कृषी आयुक्तांची माहिती अशी : कृषी आयुक्त दिवसे यांनी सांगितले, नियमित तपासणी सुरूच असते; परंतु पुन्हा विशेष तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. मुळात वितरणातील काही त्रुटी आहेत. पुरेसा साठा आहे; परंतु दुकानदारांपर्यंत साठा पोहोचत नाही. १० पैकी २ दुकानांत साठा जात नाही. औरंगाबादच्या प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे.

जिल्ह्याची खतांची मागणी अशी : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत युरिया, डीएपी, एसएसपी, टीएसपी, एमओपी, एकूण संयुक्त खते  मिळून ३ लाख १९ हजार २०० मेट्रिक टन खतांच्या मागणीपैकी २ लाख ३३ हजार ९१० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले. खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्री देसाई यांच्याकडे लिंकिंंग, जास्त दराने खत विक्री, खताबरोबर इतर माल घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दीड महिन्याने कारवाई झाली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद