शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच प्रयोग केवळ सरपंचांवरच; खासदार, आमदारांवर असे प्रयोग का नाहीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:25 IST

या निर्णयाला जिल्ह्यातील माजी सरपंचांतून विरोध केला जात असताना सर्वच प्रयोग केवळ सरपंचांवर कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

ठळक मुद्देशासन निर्णय रद्द केल्याने थेट जनतेतून सरपंच होण्याच्या अनेकांच्या आशांवर पाणी फेरले गेले.

औरंगाबाद : विकासाचा निधी थेट ग्रामपंचायतीत येऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होऊ लागल्या. त्यातही सरपंचपदासाठी मोठी स्पर्धा असते; परंतु या पदाच्या अनुषंगाने सातत्याने विविध प्रयोग केले जात असून, आता होणाऱ्या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार आहे. या निर्णयाला जिल्ह्यातील माजी सरपंचांतून विरोध केला जात असताना सर्वच प्रयोग केवळ सरपंचांवर कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

खासदार, तसेच आमदारांची थेट जनतेतून निवड होते. त्यामुळे थेट जनतेतून सरपंच निवडीचा मध्यंतरी निर्णय झाला. मात्र, तो निर्णय शासनाने रद्द केल्याने थेट जनतेतून सरपंच होण्याच्या अनेकांच्या आशांवर पाणी फेरले गेले. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यावर गावातील पदाधिकारी व्यूहरचना आखून निवडणुकीची तयारी करतात. यात त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. आरक्षण जाहीर झाल्याने ही तयारी सुरू झाली. पॅनल ठरत असताना राज्य शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्याने अनेक इच्छुकांना झटका बसला. ग्रामपंचायतीत पक्षापेक्षाही व्यक्तिगत संबंध, उमेदवाराची प्रतिमा बघतात. सरपंचपदाचे दावेदार पॅनलचे नेतृत्व करतात. त्यातही रस्सीखेच असते. मात्र, या निर्णयामुळे पॅनलचे नेतृत्व करण्यास कोणी धजावणार नाही. चांगली प्रतिमा असलेले लोक सरपंचपदापासून दूर राहण्याची शक्यता असल्याने हा निर्णय मागे घेण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. 

सरकारकडून अन्याय झाल्याची भावनाजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय करताना सरपंच परिषदेसमवेत  झालेल्या बैठकीतील आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आता काढलेले आरक्षण रद्द केले. सरपंच परिषद न्यायालयात दाद मागणार असे सरपंच परिषदेचे म्हणणे आहे. तर आमदार, खासदारांबाबत असे निर्णय का घेत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

उत्सुकता शिगेला आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांनी तयारी सुरू केली होती. मात्र, त्यांच्या प्रयत्न व तयारीवर पाणी फेरले गेले आहे. आता निवडणुकीनंतर कोणत्या प्रवर्गाला आरक्षण सुटणार याची उत्सुकता राहणार आहे. 

शासनाचा निर्णय त्याला आपण काय करणारलोकांनी सरकार निवडून दिले. ते जनतेच्या भल्यासाठी निर्णय घेतील. त्यांचे निर्णय तुम्हाला पटत नसतील तर पुढच्या वेळी दुसऱ्याला निवडून द्या. सत्ताधारी जे निर्णय घेतात. त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळत असते. त्यात आपल्याला कोण विचारते. - भास्कर पेरे, माजी सरपंच, पाटोदा

आरक्षण मिळालेल्यांवर  अन्याय करणारा निर्णय आचारसंहिता जाहीर झाल्यावर काढलेले आरक्षण रद्द करण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. आरक्षण मिळालेल्यांवर हा अन्याय करणारा निर्णय आहे. आता पॅनल तयार करायचे, त्यासाठी पुढाकार घेण्याची हिंमत इच्छुकांत राहिली नाही.- शेख अख्तर, माजी सरपंच, पंढरपूर 

सामूहिक राजकारणाला घातक निर्णय आरक्षण रद्दच करायचे होते, तर आरक्षण सोडत का काढली. वारंवार बदलणारे निर्णय संभ्रमावस्था निर्माण करीत आहे. शासनाची भूमिका ठाम असली पाहिजे.  या निर्णयामुळे सामूहिक राजकारणापेक्षा व्यक्तिगत निवडीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. हे गाव विकासासाठी चांगले नाही. - बाळासाहेब चव्हाण, माजी सरपंच, भिवधानोरा

टॅग्स :sarpanchसरपंचPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद