शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

गोदाकाठच्या नागरिकांना अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:11 IST

प्रकल्प भरल्यानंतर आतापर्यंत चार वेळेस विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून आता जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:प्रकल्प भरल्यानंतर आतापर्यंत चार वेळेस विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून आता जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रानंतर २० आॅगस्टपासून नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली होती़ २१ आॅगस्टच्या पहाटे नांदेडात अतिवृष्टी झाली होती़ तर विष्णूपुरी प्रकल्पाचे लाभक्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एकाच दिवसात विष्णूपुरीचा पाणी साठा ८ टक्क्यांहून ९० टक्क्यांवर गेला होता़ त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़ त्यानंतर सलग सुरु असलेल्या पावसामुळे आतापर्यंत विष्णूपुरी प्रकल्प चार वेळेस भरला आहे़त्यामुळे चार वेळेस प्रकल्पाचे दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ गोदावरीच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना यापूर्वी अनेकवेळा सतर्कतेचा इशारा दिला होता़ आता मात्र नाशिक व वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे औरंगाबादचे जायकवाडी धरण पहिल्यांदा ७८ टक्के भरले आहे़ तर विष्णूपुरीत आजघडीला ९० टक्के पाणीसाठा आहे़ जायकवाडी धरणाच्या वरील भागात आणखी पाऊस झाल्यास जायकवाडीतील अतिरिक्त जलसाठा गोदावरीत सोडण्यात येणार आहे़त्यामुळे जायकवाडीतून पाणी सोडल्यास धरणाखालील गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका होऊ शकतो़ त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़ त्याबाबत स्थानिक प्रशासकीय पूर यंत्रणेलाही सूचना देण्यात आल्या आहेत़