शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

गोदाकाठच्या नागरिकांना अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:11 IST

प्रकल्प भरल्यानंतर आतापर्यंत चार वेळेस विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून आता जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:प्रकल्प भरल्यानंतर आतापर्यंत चार वेळेस विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून आता जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रानंतर २० आॅगस्टपासून नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली होती़ २१ आॅगस्टच्या पहाटे नांदेडात अतिवृष्टी झाली होती़ तर विष्णूपुरी प्रकल्पाचे लाभक्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एकाच दिवसात विष्णूपुरीचा पाणी साठा ८ टक्क्यांहून ९० टक्क्यांवर गेला होता़ त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़ त्यानंतर सलग सुरु असलेल्या पावसामुळे आतापर्यंत विष्णूपुरी प्रकल्प चार वेळेस भरला आहे़त्यामुळे चार वेळेस प्रकल्पाचे दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ गोदावरीच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना यापूर्वी अनेकवेळा सतर्कतेचा इशारा दिला होता़ आता मात्र नाशिक व वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे औरंगाबादचे जायकवाडी धरण पहिल्यांदा ७८ टक्के भरले आहे़ तर विष्णूपुरीत आजघडीला ९० टक्के पाणीसाठा आहे़ जायकवाडी धरणाच्या वरील भागात आणखी पाऊस झाल्यास जायकवाडीतील अतिरिक्त जलसाठा गोदावरीत सोडण्यात येणार आहे़त्यामुळे जायकवाडीतून पाणी सोडल्यास धरणाखालील गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका होऊ शकतो़ त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़ त्याबाबत स्थानिक प्रशासकीय पूर यंत्रणेलाही सूचना देण्यात आल्या आहेत़