शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात अजूनही ‘हायअलर्ट’

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

वैजापूर- नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रात बुधवारी दुपारी सुमारे १ लाख ९३ हजार क्युसेक्सहून जास्त क्षमतेने विसर्ग सुरू आहे.

वैजापूर- नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रात बुधवारी दुपारी सुमारे १ लाख ९३ हजार क्युसेक्सहून जास्त क्षमतेने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदामाई धोक्याच्या पातळीवरून दुधडी भरून वाहत असून, हे पाणी जायकवाडीच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे वैजापूर तालुक्यातील गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन वैजापूरमधील ९ गावांतील मिळून २२५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, तर अजूनही २५० पेक्षा अधिक नागरिक सराला बेटावर अडकले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.महसूल प्रशासनाने सोमवारीच वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या १७ गावांना अति दक्षतेचा इशारा दिलेला असतानाही काही ठिकाणी या सूचनेकडे ग्रामस्थांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच ठिकाणी नागरिक अडकल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, वांजरगाव येथील सराला बेट, शिंदे वस्तीला पाण्याने वेढा घातल्याने मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यासह २५० पेक्षा जास्त नागरिक अडकले आहेत. यामुळे प्रशासनाची चांगलीच झोप उडाली आहे. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सोमवारपासून उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार सुमन मोरे, मनोहर गव्हाड हे महाराजांची मनधरणी करीत आहेत. मात्र, महाराजांनी बेट न सोडून जाण्याचे सांगितल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. गोदावरी नदीतील पाण्यामुळे कोणत्याही गावांना पुराचा वेढा पडलेला नाही. तथापि, नदी व ओढ्यातील पाण्यामुळे पुरणगाव ते बाभूळगाव, वांजरगाव ते भालगाव आणि लाखगंगा ते बाबतारा या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. काही गावांच्या शेतजमिनीत नदीपात्राबाहेर पडलेले पाणी शिरले असून, त्यामुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे.