शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

आकाशवाणी चौक वाहतूक, पादचाऱ्यांसाठी सुरू करा; नागरिक कृती समितीची मागणी

By योगेश पायघन | Updated: November 15, 2022 12:05 IST

आकाशवाणी चौक येथील सिग्नल सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे

औरंगाबाद : लोखंडी बॅरिकेटस् लावून बंद केलेला आकाशवाणी चौक वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी जवाहर कॉलनी नागरिक कृती समितीतर्फे आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आली. ‘आकाशवाणी चौक खुला झालाच पाहिजे,’ ‘आकाशवाणी चौकात मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

आकाशवाणी चौकात लोखंडी बॅरिकेटस् लावून जालना रोडवरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्रिमूर्ती चौकातून येणाऱ्या नागरिकांना सिडकोकडे जाण्यासाठी मोंढा नाका उड्डाणपुलाखालून वळसा घ्यावा लागतो. त्याचबरोबर मोंढा नाक्याकडून येणाऱ्या वाहनांना त्रिमूर्ती चौकाकडे जाता येत नाही. त्यांना सेव्हन हिल उड्डाणपुलाखालून वळसा घ्यावा लागतो.

लोखंडी बॅरिकेटस् टाकून त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी चौकातील बंद केल्याने या चौकात दररोज किरकोळ छोटे, मोठे अपघात होत आहेत. याकडे समितीने लक्ष वेधले. त्रिमूर्ती चौक रस्त्याच्या कामाला गती द्यावी, सिग्नल सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलक नागरिकांनी केली. रस्ता खुला न झाल्यास ‘रास्ता रोको’सह आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नंदकुमार गवळी, अतिक अली, किरण उबाळे, राजू टोणगिरे, राजू मंडलिक, रितेश क्रीपलानी, विशाल राऊत, गोपाळ पांढरे, बाळासाहेब दाभाडे, उत्तम कांबळे, शेख राजू, अनिल चुत्तर, राजू मंडलिक, अभय भोसले, नरेंद्र भोसले, दत्तात्रय देशपांडे, एकनाथ वाघ आदींसह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ताहा चौक आणि वाहतूक सिग्नल बंद केल्यामुळे मोंढा नाका ते सिडको; तसेच सेव्हन हिल ते क्रांती चौकमार्गे येणाऱ्या व जाणारी सर्व वाहतूक भरधाव वेगाने सुरू असते. यामुळे आकाशवाणी चौकात नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

आंदोलक म्हणतात...सहा महिन्यांपूर्वी आकाशवाणी चौकात रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात माझ्या आईचा मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा कुणासोबत घडू नये, यासाठी हा रस्ता खुला झाला पाहिजे.- बाळासाहेब दाभाडे, आंदोलक

नागरिकांना घर गाठण्यासाठी आकाशवाणी चौकातून फेरा मारून यावे लागते. विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. हा चौक पुन्हा सुरू करावा, अन्यथा आंदोलन पुन्हा तीव्र करू.- नंदकुमार गवळी, आंदोलक

व्यावसायिक असल्याने मला रोज दिवसांतून तीन ते चार वेळा ये-जा करावी लागते. प्रत्येक वेळी वळसा मारण्यात दिवसातून २० किलोमीटरचा फेरा होतो. त्यासाठी इंधनाच्या खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतोय. शिवाय गैरसोय, वेळेचा अपव्यवयही आहे.- राजकुमार कंगळे, व्यावसायिक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका