शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

आकाशवाणी चौक वाहतूक, पादचाऱ्यांसाठी सुरू करा; नागरिक कृती समितीची मागणी

By योगेश पायघन | Updated: November 15, 2022 12:05 IST

आकाशवाणी चौक येथील सिग्नल सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे

औरंगाबाद : लोखंडी बॅरिकेटस् लावून बंद केलेला आकाशवाणी चौक वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी जवाहर कॉलनी नागरिक कृती समितीतर्फे आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आली. ‘आकाशवाणी चौक खुला झालाच पाहिजे,’ ‘आकाशवाणी चौकात मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

आकाशवाणी चौकात लोखंडी बॅरिकेटस् लावून जालना रोडवरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्रिमूर्ती चौकातून येणाऱ्या नागरिकांना सिडकोकडे जाण्यासाठी मोंढा नाका उड्डाणपुलाखालून वळसा घ्यावा लागतो. त्याचबरोबर मोंढा नाक्याकडून येणाऱ्या वाहनांना त्रिमूर्ती चौकाकडे जाता येत नाही. त्यांना सेव्हन हिल उड्डाणपुलाखालून वळसा घ्यावा लागतो.

लोखंडी बॅरिकेटस् टाकून त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी चौकातील बंद केल्याने या चौकात दररोज किरकोळ छोटे, मोठे अपघात होत आहेत. याकडे समितीने लक्ष वेधले. त्रिमूर्ती चौक रस्त्याच्या कामाला गती द्यावी, सिग्नल सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलक नागरिकांनी केली. रस्ता खुला न झाल्यास ‘रास्ता रोको’सह आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नंदकुमार गवळी, अतिक अली, किरण उबाळे, राजू टोणगिरे, राजू मंडलिक, रितेश क्रीपलानी, विशाल राऊत, गोपाळ पांढरे, बाळासाहेब दाभाडे, उत्तम कांबळे, शेख राजू, अनिल चुत्तर, राजू मंडलिक, अभय भोसले, नरेंद्र भोसले, दत्तात्रय देशपांडे, एकनाथ वाघ आदींसह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ताहा चौक आणि वाहतूक सिग्नल बंद केल्यामुळे मोंढा नाका ते सिडको; तसेच सेव्हन हिल ते क्रांती चौकमार्गे येणाऱ्या व जाणारी सर्व वाहतूक भरधाव वेगाने सुरू असते. यामुळे आकाशवाणी चौकात नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

आंदोलक म्हणतात...सहा महिन्यांपूर्वी आकाशवाणी चौकात रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात माझ्या आईचा मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा कुणासोबत घडू नये, यासाठी हा रस्ता खुला झाला पाहिजे.- बाळासाहेब दाभाडे, आंदोलक

नागरिकांना घर गाठण्यासाठी आकाशवाणी चौकातून फेरा मारून यावे लागते. विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. हा चौक पुन्हा सुरू करावा, अन्यथा आंदोलन पुन्हा तीव्र करू.- नंदकुमार गवळी, आंदोलक

व्यावसायिक असल्याने मला रोज दिवसांतून तीन ते चार वेळा ये-जा करावी लागते. प्रत्येक वेळी वळसा मारण्यात दिवसातून २० किलोमीटरचा फेरा होतो. त्यासाठी इंधनाच्या खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतोय. शिवाय गैरसोय, वेळेचा अपव्यवयही आहे.- राजकुमार कंगळे, व्यावसायिक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका