शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आमच्याकडून एक टपरी हटत नाही,तुम्ही झाडे तोडायला सांगतात; दानवेंचं अधिकाऱ्यांना अजब उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 10:37 IST

दानवे यांनी वेळ नसल्याचे म्हणत पुढचा विषय घेण्यास सांगितला. तसेच शिर्डी, वेरूळ, अजिंठा रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीवर बोलण्याचे सुद्धा टाळले.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी विमानतळ सल्लागार समितीची बैठक झाली. तर विमानतळ परिसरात वाढलेल्या झाडांमुळे विमानांना अडथळ निर्माण होत असून त्यांची छाटणी करणे गरजेचे असल्याचा प्रश्न विमानतळ अधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. मात्र 'आमच्याकडून एक टपरी हटत नाही, तुम्ही झाडे तोडायला सांगतात' असे अजब उत्तर विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष व भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी दिल्याने अधिकारी आश्चर्यचकित झाले.

या बैठकीत विमानतळाचे अनेक प्रश्न मांडले जाणार होते. मात्र, वेळ नसल्याचे म्हणत विमानतळाच्या पाण्याच्या समस्येसह अनेक प्रश्नांना समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बगल दिली. माझ्याशी संबंधित विषय घ्या म्हणत. संबंधित विषयांवर त्या-त्या प्रशासनाबरोबर चर्चा करण्याचे सांगून बैठक आटोपती घेतली. परिणामी, अनेक विषयांवर चर्चाच झाली नाही.

विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी विमानतळाच्या आतापर्यंत झालेल्या सुविधांविषयी आणि प्रश्नांविषयी माहिती दिली. महापालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नाही, असे म्हणत असतानाही दानवे यांनी वेळ नसल्याचे म्हणत पुढचा विषय घेण्यास सांगितला. तसेच शिर्डी, वेरूळ, अजिंठा रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीवर बोलण्याचे सुद्धा टाळले.

विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना उंच झाडांचा अडथळा होत आहे. वैमानिकांकडून तक्रारी होत आहेत. ही झाडे पूर्ण नाही, पण त्याची छाटणी करणे गरजेचे असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी म्हटले. विस्तारीकरणासाठी जमीन मिळेल. तेव्हा हा प्रश्न सुटेल. आमच्याकडून एक टपरी हटत नाही, तुम्ही झाडे तोडायला सांगतात, असे दानवे म्हणाले.

दुबईला जाता येईल १० हजारांत

दुबईच्या कनेक्टिंग फ्लाईटसाठी कस्टमची सुविधा मिळाली आहे. परंतु इमिग्रेशनसाठी अजून परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. हे जर झाले तर थायलंड, दुबईला विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल. तर १० हजार रुपयांत दुबईला जाता येईल, असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.