शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

विमानसेवा कधी हवेत, कधी जमिनीवर; औरंगाबादला विमान कंपन्या फिरवतात ‘गोल गोल’

By संतोष हिरेमठ | Updated: July 27, 2022 11:38 IST

आता सायंकाळी उड्डाण घेणारे दिल्ली- औरंगाबाद- दिल्ली विमान ३० जुलैपासून बंद करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : विमान कंपन्या औरंगाबादला ‘गोल गोल’ फिरवत असल्याची परिस्थिती आहे. सुरू केलेली विमानसेवा अचानक बंद केली जाते. आता सायंकाळी उड्डाण घेणारे दिल्ली- औरंगाबाद- दिल्ली विमान ३० जुलैपासून बंद करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. पुरेशी प्रवासीसंख्या नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे औरंगाबादहून एक विमान कमी होणार आहे. परिणामी, दिल्लीहून महिन्याकाठी येणाऱ्या ३ हजार प्रवाशांची संख्या घटणार असून, पर्यटन, उद्योग क्षेत्रासह औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीला याचा फटका बसणार आहे.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २ जुलैपासून सकाळच्या वेळेत आठवड्यातून तीन दिवसांसाठी दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली होती; परंतु ही विमानसेवाही गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आली. त्यानंतर सायंकाळचे दिल्लीचे विमान बंद करून ३० जुलैपासून दररोज सकाळी उड्डाण करण्याचा निर्णय १२ जुलै रोजी घेण्यात आला होता. त्यातही आता अचानक बदल करून १ ऑगस्टपासून इंडिगोने केवळ आठवड्यातून तीन दिवस सकाळच्या वेळेत उड्डाण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे एक ऑगस्टपासून औरंगाबादहून एक विमानसेवा कमी होणार आहे.

किती प्रवाशांची ये-जा ?इंडिगोच्या सध्याच्या सायंकाळच्या १८० आसन क्षमतेच्या विमानाने दिल्लीहून रोज जवळपास १०० प्रवासी शहरात दाखल होतात. त्यानुसार महिन्याकाठी ३ हजार प्रवासी औरंगाबादेत येणे यापुढे थांबणार आहे.

विमानतळाचे अधिकारी म्हणाले...चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, ऑपरेशन रिजनमुळे सेवेसंदर्भात विमान कंपन्या निर्णय घेत असतात. विमानसेवा पुन्हा पूर्ववत होईल. इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.

नव्या कंपन्यांवर परिणामइंडिगोचे दिल्लीचे सायंकाळचे विमान ३० जुलैपासून बंद केले जाणार आहे. सकाळी नियमित उड्डाण घेईल, असे सांगण्यात येते; परंतु दिल्लीची विमानसेवा ऑगस्टमध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस सध्या दाखवीत आहे. याचा पर्यटन क्षेत्रावर परिणाम होईल. नव्या कंपन्या औरंगाबादेत येण्याचे धाडस करणार नाही.- आशुतोष बडवे, अध्यक्ष ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

तिकीट दर, वेळेचा परिणामऑगस्टपासून इंडिगोचे दिल्ली विमान हे सकाळच्या सत्रात सुरू राहील. सध्याचे सायंकाळचे विमान बंद होईल. हे सकाळचे विमान आठवड्यातून दररोज उड्डाण घेण्याऐवजी तीनच दिवस असेल. तिकिटाचे वाढीव दर आणि विमानाची वेळ, हे घटलेल्या विमान प्रवासी संख्येचे कारण आहे.- अक्षय चाबूकस्वार, सदस्य, औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रूप

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन