शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

विमानसेवा कधी हवेत, कधी जमिनीवर; औरंगाबादला विमान कंपन्या फिरवतात ‘गोल गोल’

By संतोष हिरेमठ | Updated: July 27, 2022 11:38 IST

आता सायंकाळी उड्डाण घेणारे दिल्ली- औरंगाबाद- दिल्ली विमान ३० जुलैपासून बंद करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : विमान कंपन्या औरंगाबादला ‘गोल गोल’ फिरवत असल्याची परिस्थिती आहे. सुरू केलेली विमानसेवा अचानक बंद केली जाते. आता सायंकाळी उड्डाण घेणारे दिल्ली- औरंगाबाद- दिल्ली विमान ३० जुलैपासून बंद करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. पुरेशी प्रवासीसंख्या नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे औरंगाबादहून एक विमान कमी होणार आहे. परिणामी, दिल्लीहून महिन्याकाठी येणाऱ्या ३ हजार प्रवाशांची संख्या घटणार असून, पर्यटन, उद्योग क्षेत्रासह औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीला याचा फटका बसणार आहे.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २ जुलैपासून सकाळच्या वेळेत आठवड्यातून तीन दिवसांसाठी दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली होती; परंतु ही विमानसेवाही गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आली. त्यानंतर सायंकाळचे दिल्लीचे विमान बंद करून ३० जुलैपासून दररोज सकाळी उड्डाण करण्याचा निर्णय १२ जुलै रोजी घेण्यात आला होता. त्यातही आता अचानक बदल करून १ ऑगस्टपासून इंडिगोने केवळ आठवड्यातून तीन दिवस सकाळच्या वेळेत उड्डाण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे एक ऑगस्टपासून औरंगाबादहून एक विमानसेवा कमी होणार आहे.

किती प्रवाशांची ये-जा ?इंडिगोच्या सध्याच्या सायंकाळच्या १८० आसन क्षमतेच्या विमानाने दिल्लीहून रोज जवळपास १०० प्रवासी शहरात दाखल होतात. त्यानुसार महिन्याकाठी ३ हजार प्रवासी औरंगाबादेत येणे यापुढे थांबणार आहे.

विमानतळाचे अधिकारी म्हणाले...चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, ऑपरेशन रिजनमुळे सेवेसंदर्भात विमान कंपन्या निर्णय घेत असतात. विमानसेवा पुन्हा पूर्ववत होईल. इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.

नव्या कंपन्यांवर परिणामइंडिगोचे दिल्लीचे सायंकाळचे विमान ३० जुलैपासून बंद केले जाणार आहे. सकाळी नियमित उड्डाण घेईल, असे सांगण्यात येते; परंतु दिल्लीची विमानसेवा ऑगस्टमध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस सध्या दाखवीत आहे. याचा पर्यटन क्षेत्रावर परिणाम होईल. नव्या कंपन्या औरंगाबादेत येण्याचे धाडस करणार नाही.- आशुतोष बडवे, अध्यक्ष ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

तिकीट दर, वेळेचा परिणामऑगस्टपासून इंडिगोचे दिल्ली विमान हे सकाळच्या सत्रात सुरू राहील. सध्याचे सायंकाळचे विमान बंद होईल. हे सकाळचे विमान आठवड्यातून दररोज उड्डाण घेण्याऐवजी तीनच दिवस असेल. तिकिटाचे वाढीव दर आणि विमानाची वेळ, हे घटलेल्या विमान प्रवासी संख्येचे कारण आहे.- अक्षय चाबूकस्वार, सदस्य, औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रूप

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन