शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

विमानसेवा कधी हवेत, कधी जमिनीवर; औरंगाबादला विमान कंपन्या फिरवतात ‘गोल गोल’

By संतोष हिरेमठ | Updated: July 27, 2022 11:38 IST

आता सायंकाळी उड्डाण घेणारे दिल्ली- औरंगाबाद- दिल्ली विमान ३० जुलैपासून बंद करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : विमान कंपन्या औरंगाबादला ‘गोल गोल’ फिरवत असल्याची परिस्थिती आहे. सुरू केलेली विमानसेवा अचानक बंद केली जाते. आता सायंकाळी उड्डाण घेणारे दिल्ली- औरंगाबाद- दिल्ली विमान ३० जुलैपासून बंद करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. पुरेशी प्रवासीसंख्या नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे औरंगाबादहून एक विमान कमी होणार आहे. परिणामी, दिल्लीहून महिन्याकाठी येणाऱ्या ३ हजार प्रवाशांची संख्या घटणार असून, पर्यटन, उद्योग क्षेत्रासह औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीला याचा फटका बसणार आहे.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २ जुलैपासून सकाळच्या वेळेत आठवड्यातून तीन दिवसांसाठी दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली होती; परंतु ही विमानसेवाही गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आली. त्यानंतर सायंकाळचे दिल्लीचे विमान बंद करून ३० जुलैपासून दररोज सकाळी उड्डाण करण्याचा निर्णय १२ जुलै रोजी घेण्यात आला होता. त्यातही आता अचानक बदल करून १ ऑगस्टपासून इंडिगोने केवळ आठवड्यातून तीन दिवस सकाळच्या वेळेत उड्डाण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे एक ऑगस्टपासून औरंगाबादहून एक विमानसेवा कमी होणार आहे.

किती प्रवाशांची ये-जा ?इंडिगोच्या सध्याच्या सायंकाळच्या १८० आसन क्षमतेच्या विमानाने दिल्लीहून रोज जवळपास १०० प्रवासी शहरात दाखल होतात. त्यानुसार महिन्याकाठी ३ हजार प्रवासी औरंगाबादेत येणे यापुढे थांबणार आहे.

विमानतळाचे अधिकारी म्हणाले...चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, ऑपरेशन रिजनमुळे सेवेसंदर्भात विमान कंपन्या निर्णय घेत असतात. विमानसेवा पुन्हा पूर्ववत होईल. इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.

नव्या कंपन्यांवर परिणामइंडिगोचे दिल्लीचे सायंकाळचे विमान ३० जुलैपासून बंद केले जाणार आहे. सकाळी नियमित उड्डाण घेईल, असे सांगण्यात येते; परंतु दिल्लीची विमानसेवा ऑगस्टमध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस सध्या दाखवीत आहे. याचा पर्यटन क्षेत्रावर परिणाम होईल. नव्या कंपन्या औरंगाबादेत येण्याचे धाडस करणार नाही.- आशुतोष बडवे, अध्यक्ष ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

तिकीट दर, वेळेचा परिणामऑगस्टपासून इंडिगोचे दिल्ली विमान हे सकाळच्या सत्रात सुरू राहील. सध्याचे सायंकाळचे विमान बंद होईल. हे सकाळचे विमान आठवड्यातून दररोज उड्डाण घेण्याऐवजी तीनच दिवस असेल. तिकिटाचे वाढीव दर आणि विमानाची वेळ, हे घटलेल्या विमान प्रवासी संख्येचे कारण आहे.- अक्षय चाबूकस्वार, सदस्य, औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रूप

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन