शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

एअर इंडियाची मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानसेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 09:23 IST

एअर इंडियाने मुंबईसाठी २२ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेत वेळापत्रकही जाहीर केले असून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे विमान उड्डाण घेईल.

औरंगाबाद : मोठ्या प्रतिक्षेनंतर तब्बल सहा महिन्यानंतर एअर इंडियाची मुंबई - औरंगाबाद - मुंबई विमानसेवा अखेर मंगळवार दि. २२  सप्टेंबरपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी या विमानाने मुंबईहून २९ प्रवासी शहरात दाखल झाले, तर ४७ प्रवासी औरंगाबादहून मुंबईला रवाना झाले, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ६ महिन्यांनंतर औरंगाबादला मुंबईची हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. मुंबईहून सायंकाळी ६ वाजता उड्डाण घेतल्यानंतर औरंगाबाद विमानतळावर सायंकाळी ७ वाजता हे विमान दाखल झाले. त्यानंतर रात्री ८.०६ वा. या विमानाने औरंगाबादहून मुंबईसाठी उड्डाण घेतले. औरंगाबादहून दिल्ली, हैदराबाद विमानसेवा सुरू झाल्यानंतर मुंबईची विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात होती. इंडिगोकडूनही आता मुंबई- औरंगाबाद- मुंबई सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. एअर इंडियाने मुंबईसाठी २२ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेत वेळापत्रकही जाहीर केले असून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे विमान उड्डाण घेईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAirportविमानतळAir Indiaएअर इंडियाMumbaiमुंबई