शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहर कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट अवघड; मात्र प्रशासन सक्षम असल्याची अधिकाऱ्यांची खंडपीठात ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:55 IST

शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सोसावा लागणारा त्रास यावर काहीतरी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाचारण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाच अधिकारी खंडपीठात हजर कसूरदार नागरिकांकडून दंड वसूल करणे आवश्यकदर पंधरा दिवसांनी न्यायालयात अहवाल देण्याची सूचना

औरंगाबाद : शहरापुढे कचऱ्यासह अनेक गंभीर नागरी समस्या आहेत. शहराला कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट अवघड आहे. मात्र, प्रशासन हा प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम असल्याची ग्वाही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांच्या खंडपीठात दिली. 

महापालिकेशी संबंधित विविध विषयांवरील नागरी प्रश्नांसंबंधित जनहित याचिकांवर आज खंडपीठात एकत्रित सुनावणी झाली. खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीवेळी सूचित केल्याप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आणि महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी व्यक्तिश: हजर होते. 

विभागीय आयुक्तांनी खंडपीठास सांगितले की, ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. घनकचऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासंदर्भात १८ आणि २८ फेब्रुवारी रोजी बैठका घेतल्या. मनपा आयुक्त आणि कर्मचाऱ्यांसोबत शहरातील कचरा जेथे टाकला जातो त्या जागांची प्रत्यक्ष पाहणी केली. शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो, असे महापालिकेचे म्हणणे आहे. हा आकडा शास्त्रीय पद्धतीने काढलेला नाही. प्रत्यक्षात इतका कचरा निर्माण होतो का, हे तपासावे लागेल. कारण त्यावरच पुढील नियोजन अवलंबून आहे, असे ते म्हणाले. 

कचऱ्याचा ५० टक्के प्रश्न प्लास्टिकमुळे निर्माण झाला आहे. प्लास्टिकवर बंदी असताना त्याचा सर्रास वापर सुरू आहे. कसूरदारांवर फौजदारी कारवाईचे निर्देश आपण दिले असल्याचे केंद्रेकर म्हणाले. ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण समाधानकारक नाही. बहुतांश कचरा एकत्रितच टाकला जातो. महापालिकेतील माजी सैनिकांचे ‘उपद्रव शोधक पथक’ आणि सफाई कर्मचाऱ्यांची ३ मार्चला बैठक बोलावली आहे. तेच हा कचऱ्याचा प्रश्न सोडवू शकतात. कचरा वेचणाऱ्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. एकत्रित कचरा दिल्यास त्यांची दररोज ३०० रुपये कमाई होते, तर वेगळा केलेला कचरा दिल्यास त्यांची एक हजार रुपयांपर्यंत कमाई होते. जे नागरिक कचरा वेगळा करीत नाहीत; अथवा उघड्यावर कचरा टाकतात त्यांना दंड ठोठावणे आवश्यक आहे. कचरा विलगीकरणाबाबत लोकजागृती करणे आवश्यक आहे. संनियंत्रण समिती यासाठी येण्यास तयार असल्याचे केंद्रेकर म्हणाले. चिकलठाणा आणि पडेगाव येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याचे आश्वासन त्यांनी खंडपीठास दिले. राज्य शासनाकडून १०० कोटींऐवजी केवळ २६ कोटींचा निधी मिळाला आहे. या आर्थिक वर्षात त्यापैकी केवळ १२ कोटीच खर्च होऊ शकतात, असे केंद्रेकर म्हणाले.

महापालिकेमध्ये अनेक पदे रिक्त आहेत, ती का भरली जात नाहीत, अशी विचारणा खंडपीठाने राज्य शासनाला केली. शहरातील बेशिस्त वाहतुकीच्या प्रश्नावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. विभागीय आयुक्तांनी आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांशी यासंदर्भात चर्चा करून योग्य ती उपाययोजना करावी, असे डॉ. निपुण विनायक यांनी सुचविले.

महापालिकेशी संबंधित पार्किंग आणि पिण्याचे पाणी या प्रश्नांवरील याचिकांवर २० मार्चला सुनावणी ठेवण्यात आली आहे. आज सुनावणी झालेल्या विषयांवर दर १५ दिवसांनी कामाबाबत प्रगती अहवाल खंडपीठात सादर करण्याचे तोंडी निर्देश यावेळी देण्यात आले.

‘समांतर’साठी मिळाले ३00 कोटी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी खंडपीठास सांगितले की, पाणी प्रश्नासंदर्भात आम्ही तज्ज्ञांची नेमणूक केल्याने शहरातील पाणीपुरवठ्यात चार एमएलडी इतकी वाढ झाली आहे. समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी ३०० कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. आम्ही कायदेतज्ज्ञांचे यासंदर्भात मत घेतले असून, समांतर पाणीपुरवठा योजना आता पूर्वीच्या कंपनीबरोबर राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे जायकवाडी ते फारोळा, अशी जलवाहिनी टाकण्यास आम्हाला परवानगी देण्याची विनंती शासनाकडे केली आहे. हे काम लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

उपाय सुचविण्यासाठी पाचारणसुनावणीवेळी प्रारंभीच खंडपीठाने स्पष्ट केले की, या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नोटीस बजावून बोलाविण्यात आलेले नाही. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सोसावा लागणारा त्रास यावर काहीतरी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाचारण करण्यात आले आहे.

आपल्याकडून नागरिकांना अपेक्षासर्वसामान्य नागरिक आणि न्यायालयालाही आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. सर्वसामान्यांचे मूलभूत हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काम करताना तुम्हाला कोणताही अडथळा येत असेल, तर तो तुम्ही न्यायालयासमोर नि:संकोच मांडावा, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

खंडपीठात या मुद्यांवर झाली चर्चा- महापालिकेत अनेक पदे रिक्त; ती का भरत नाही- पूर्वीच्या कंपनीबरोबर समांतर योजना राबविणे अशक्य- ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण असमाधानकारक - चिकलठाणा आणि पडेगाव येथे घनकचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याचे आश्वासन- शासनाने जाहीर केलेल्या १०० कोटींपैकी केवळ २४ कोटी रुपये मिळाले- उपद्रवशोध पथकाची ३ मार्च रोजी महापालिकेत बैठक- शहरातील बेशिस्त वाहतुकीबद्दल खंडपीठाची नाराजी

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ