शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

'ऐ मेरी जमी...'; पाकिस्तानमधून परतलेल्या हसीना बेगम यांनी मातृभूमीत घेतला अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:48 IST

Hasina Begum, returning from Pakistan, breathed her last in her homeland पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादमधील हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले.

ठळक मुद्दे पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले. मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या

औरंगाबाद : पासपोर्ट हरवल्याने पाकिस्तानमध्ये तब्बल १८ वर्ष काढलेल्या हसीना बेगम या २६ जानेवारील त्यांच्या जन्मगावी औरंगाबाद येथे परतल्या. मात्र, मातृभूमीत परत आल्यानंतर केवळ १५ दिवसांमध्ये त्यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. वारस नसल्याने शहरातील त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर औरंगाबाद येथे अंत्यविधी केले. 

पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादमधील हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले. औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तान न्यायालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची सुटका झाली आणि प्रजासत्ताक दिनी हसीना बेगम औरंगाबाद येथे परतल्या होत्या. मातृभूमीत परतताच त्यांनी स्वर्गात आल्यासारखे वाटत आहे, येथे शांततेची जाणीव होते अशी प्रतिक्रिया दिली होती. औरंगाबाद येथे ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती या नातेवाईकाकडे त्या राहत होत्या. या दरम्यान, त्यांच्या नावे असलेली जमीन हडप झाल्याची घटना उघडकीस आली होती. या विरोधात लढा देण्याची तयारी सुद्धा त्यांनी केली होती. मात्र, मातृभूमीत परत आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांमध्ये त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

औरंगाबादमधील रशिदपुरा येथील मूळ वास्तवहसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदपुरा परिसरातील आहेत. त्यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. १८ वर्षांपूर्वी त्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासही पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान, त्यांचा पासपोर्ट लाहोर येथे हरवला. यामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये कैद करण्यात आले. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली. हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.

येथे शांततेची जाणीव होतेपाकिस्तानातील अनुभवाबाबत हसिना बेगम यांनी सांगितले की, मी अत्यंत बिकट परिस्थितीत होते. या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या मदतीबाबत मी खूप आभारी आहे. मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPakistanपाकिस्तान