शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

यशवंतरावानंतर राजकारण भरकटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 13:35 IST

यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत राज्याचे सूत्रे स्वीकारली.

नांदेड : यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत राज्याचे सूत्रे स्वीकारली. त्यावेळी राज्याच्या विविध विभागांमध्ये परस्परांबद्दल अविश्‍वास, संशय व तणावाचे वातावरण होते. त्यामुळे प्रादेशिक एकात्मता निर्माण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. या सर्व बिकट अवस्थेतून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे काम यशवंतरावांनी केले. परंतु त्यांच्यानंतर मात्र महाराष्ट्राचे राजकारण भरकटले असल्याचे प्रतिपादन राजकीय वेिषक प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, लातूर आणि पीपल्स कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात प्रा. डॉ. पवार बोलत होते. ते म्हणाले, यशवंतरावानंतर काही मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रयत्न केले. परंतु अनेक कारणांमुळे त्यांना यश आले नाही. त्यात वसंतराव नाईक, शरद पवार आणि शंकरराव चव्हाण यांचा समावेश आहे. यशवंतरावाच्या वेळी जातीय व सामाजिक विषमता मोठय़ा प्रमाणावर होती. त्यामुळे सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. परंपरागत सामाजिक मूल्ये आणि सरंजामशाही मनोवृत्तीला आधुनिकतेत रुपांतरित करणे हाही त्यांच्यादृष्टीने महत्वाचा प्रश्न होता. त्यातून एकसंघ, विकसीत, संपन्न व आधुनिक महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्धार यशवंतरावांनी केला होता. त्याची अंमलबजावणीही नेटाने केली. माजी मंत्री कमलकिशोर कदम म्हणाले, शरद पवार यांनी अत्यंत काळजीपूर्वक परिस्थिती हाताळत सहमतीचे राजकारण केले. त्यामुळे अनेक पक्षांत त्यांचे मित्र आहेत. एक सहकारी या नात्याने पवार यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणीही त्यांनी सांगितल्या. सूत्रसंचालन डॉ.अशोक सिद्धेवाड यांनी केले. प्रास्ताविक प्रा. उत्तमराव सूर्यवंशी तर हरिभाऊ जवळगे यांनी आभार मानले. /(प्रतिनिधी)