शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

यशवंतरावानंतर राजकारण भरकटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 13:35 IST

यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत राज्याचे सूत्रे स्वीकारली.

नांदेड : यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत राज्याचे सूत्रे स्वीकारली. त्यावेळी राज्याच्या विविध विभागांमध्ये परस्परांबद्दल अविश्‍वास, संशय व तणावाचे वातावरण होते. त्यामुळे प्रादेशिक एकात्मता निर्माण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. या सर्व बिकट अवस्थेतून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे काम यशवंतरावांनी केले. परंतु त्यांच्यानंतर मात्र महाराष्ट्राचे राजकारण भरकटले असल्याचे प्रतिपादन राजकीय वेिषक प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, लातूर आणि पीपल्स कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात प्रा. डॉ. पवार बोलत होते. ते म्हणाले, यशवंतरावानंतर काही मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रयत्न केले. परंतु अनेक कारणांमुळे त्यांना यश आले नाही. त्यात वसंतराव नाईक, शरद पवार आणि शंकरराव चव्हाण यांचा समावेश आहे. यशवंतरावाच्या वेळी जातीय व सामाजिक विषमता मोठय़ा प्रमाणावर होती. त्यामुळे सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. परंपरागत सामाजिक मूल्ये आणि सरंजामशाही मनोवृत्तीला आधुनिकतेत रुपांतरित करणे हाही त्यांच्यादृष्टीने महत्वाचा प्रश्न होता. त्यातून एकसंघ, विकसीत, संपन्न व आधुनिक महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्धार यशवंतरावांनी केला होता. त्याची अंमलबजावणीही नेटाने केली. माजी मंत्री कमलकिशोर कदम म्हणाले, शरद पवार यांनी अत्यंत काळजीपूर्वक परिस्थिती हाताळत सहमतीचे राजकारण केले. त्यामुळे अनेक पक्षांत त्यांचे मित्र आहेत. एक सहकारी या नात्याने पवार यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणीही त्यांनी सांगितल्या. सूत्रसंचालन डॉ.अशोक सिद्धेवाड यांनी केले. प्रास्ताविक प्रा. उत्तमराव सूर्यवंशी तर हरिभाऊ जवळगे यांनी आभार मानले. /(प्रतिनिधी)