शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

दुरुस्तीनंतरही शहरात विजेचा लपंडाव थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 19:13 IST

महावितरणचे पितळ उघडे

ठळक मुद्दे बिलांची मात्र सक्तीने वसुलीग्राहकांमध्ये संतापाची भावना

औरंगाबाद : अलीकडे वीज बिलांची सक्तीने वसुली केली जाते, त्याच पद्धतीने महावितरणने ग्राहकांना सुविधाही दिल्या पाहिजे. मागील आठ-दहा दिवसांपासून शहरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. यासंदर्भात कल्पना देण्यासाठी ग्राहकांनी दूरध्वनी केला, तर अधिकारी-कर्मचारी समोरून प्रतिसाद देत नाहीत. रात्रीच्या वेळी नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी बंद करून ठेवले जातात. एकीकडे ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार करतात, तर दुसरीकडे त्यांच्या आवाहनाला त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हरताळ फासला जात असल्याचे विदारक चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. 

मागील काही दिवसांपासून शहरातील तापमान ४१ अंशांजवळ पोहोचले आहे. उकाड्यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यासंदर्भात आतापर्यंतच्या दोन शुक्रवारी महावितरणने शहर विभाग-१ व विभाग-२ मध्ये वीजपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीची कामे हाती घेतल्याचा महावितरणने दावा केला आहे; परंतु असे असले तरीही रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरूच आहे. 

विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला, तर ‘लोड वाढला आहे. वादळी वारा, पावसामुळे वाहिन्यांवर झाडे कोसळत आहेत. इन्सुलेटर फुटतात’, असे उत्तर देऊन ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

सतत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे अनेक ठिकाणी घरातील फ्रीज, पंखे, टीव्ही आदींसह अन्य उपकरणे जळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यास जबाबदार कोण, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटल्या आहेत. रात्री-बेरात्री वीज गेल्यास नागरिकांना उकाड्यातच रात्र काढावी लागते. पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना म्हणून महावितरणने झाडांच्या फांद्यांची छाटणी केली. 

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्तमहावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल दुुरुस्तीची कामे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे वाळूज महानगरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. सिडको वाळूज महानगरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या अभियंत्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.   

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादelectricityवीज