शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही प्रशासनाच्या दुष्काळाप्रती शून्य संवेदना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:43 IST

जिल्ह्यातील ८६४ पैकी ६०० ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याची माहिती समोर आली

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळ ८६४ पैकी ६०० ग्रामपंचायतींत रोहयोची कामे बंदच 

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० आॅक्टोबर रोजी बैठक घेऊन सतर्कतेबाबत आदेश दिलेले असतानाही प्रशासकीय यंत्रणा दुष्काळाप्रती ‘शून्य संवेदना’ असल्यासारखी वागत असल्याचे मंगळवारी जिल्हा दक्षता व सनियंत्रण, ग्रामीण विकासच्या बैठकीत समोर आले. 

जिल्ह्यातील ८६४ पैकी ६०० ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याची माहिती समोर आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा दुष्काळाबाबत किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले.  १० आॅक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा आढावा बैठकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेने काम करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा किती गांभीर्याने काम करीत आहे, याचे पितळ मंगळवारी उघडे पडले.

जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांकडे किती कामे सुरू आहेत, किती कामे सुरू होतील, याबाबत काहीही ठोस माहिती नव्हती. जि.प., सिंचन, वन, सामाजिक वनीकरणाची किती कामे सुरू आहेत, याची माहिती खा. चंद्रकांत खैरे यांनी बैठकीत विचारली. जिल्ह्यातील ८६४ ग्रामपंचायतींपैकी ६०० ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू नसल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देताच जिल्हाधिकारी चौधरी आणि खैरे अवाक् झाले. दुष्काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी २४ तास ड्यूटीवर असतात, याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवावे. बैठकीला येताना अधिकाऱ्यांनी अभ्यास करून यावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

...तर बीडीओ जबाबदार गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) ग्रामपंचायतींतर्गत कामे सुरू नाहीत, अशी तक्रार करू नये. ग्रामसेवकांऐवजी गटविकास अधिकाऱ्यांना रोहयोच्या कामांप्रकरणी जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बैठकीत दिला. १० आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. अद्यापही प्रशासकीय यंत्रणा हालली नाही. प्रत्येक बीडीओच्या क्षेत्रामध्ये किती कामे सुरू आहेत, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विचारली. अनेकांनी कामांची संख्या सांगून वेळ मारून नेली.

सहाशे ग्रामपंचायती कागदेपत्रीचविभागात बदनाम असलेल्या रोजगार हमी योजनेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे; पण जिल्ह्यातील प्रशासनाच्या संवेदना हरवल्यामुळे योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील ६०० ग्रामपंचायतस्तरावर एकही काम सुरू नसल्याचे बैठकीत समोर आले. रोजगार हमी योजनेंतर्गत कागदोपत्रीच कामे दिली जात असल्याचा संशय या निमित्ताने बळावला आहे. 

 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकार